शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पावसाचा भात पिकाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:06 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पावसाचे प्रमाण भातशेतीसाठी फायदेशीर असल्यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस भात पिकाला फायद्याचा असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र इतर पिकांसाठी हा पाऊस धोक्याचा ठरत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संततधार पावसामुळे टमाटा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे दिंडोरी : बळीराजाला तारणार; यंदा ‘इंद्रायणी’चे उत्पादन वाढणार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पावसाचे प्रमाण भातशेतीसाठी फायदेशीर असल्यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सध्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस भात पिकाला फायद्याचा असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र इतर पिकांसाठी हा पाऊस धोक्याचा ठरत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संततधार पावसामुळे टमाटा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पिकाचे प्रमाण अधिक असते. या भागातील मोठा शेतकरीवर्ग भाताच्या विविध प्रकारचे बियाणे खरेदी करून लागवड करीत असतो. त्यात दप्तरी, भोगवती, लालकोर, महालक्ष्मी, कोळपी आदी स्वरूपाची बियाणे खरेदी करून लागवड करीत असतो; परंतु यंदा दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्याला भाताची नगरी म्हणून ओळखले जाते. यंदा या भागातील शेतकरीवर्गाने इंद्रायणी भाताला पसंती दिली आहे. हा भाग भातशेतीसाठी योग्य मानला जातो. त्यामुळे यंदा शेतकरीवर्गाने आपल्या शेतामध्ये इंद्रायणी भाताची रोपे निर्माण करून मोठ्या प्रमाणावर लागवड केली व सध्या स्थितीत इंद्रायणी भात पिकाची स्थिती उत्तम असल्याचे शेतकºयांनी सांगितले. पिकावर मावा, पिवळापणा तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसत नसल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.दिंडोरी तालुक्यात कुंडी वाफा, दलदल वाफा, जमीन पायरी, टप्प्यात वाफा पद्धतीने भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यासाठी संततधार पावसाची गरज असते. सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पीक जोमात असल्याचे शेतकरी आनंदात आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी