शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

परतीचा पाऊस आॅक्टोबरमध्येही अधिक; मुक्काम आणखी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:25 IST

यंदा पावसाची कृपादृष्टी बरसल्याने राज्यातील धरणे आणि पाणलोट क्षेत्रांची तहान भागली आहे, तर मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर होणारे वाद पुढीलवर्षी टळण्याची सकारात्क बाब या पावसामुळे घडून आलेली आहे.

नाशिक : यंदा पावसाची कृपादृष्टी बरसल्याने राज्यातील धरणे आणि पाणलोट क्षेत्रांची तहान भागली आहे, तर मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर होणारे वाद पुढीलवर्षी टळण्याची सकारात्क बाब या पावसामुळे घडून आलेली आहे. नाशिक जिल्ह्यावरील पावसाची कृपा अजूनही कायम असून, जिल्ह्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याची सरासरीदेखील ओलांडली आहे. जवळपास २१७ मि.मी. अधिक पाऊस या महिन्यात कोसळला असून, येत्या चार-पाच दिवसांत यात आणखी वाढ होण्याचीदेखील शक्यता आहे.यंदा जिल्ह्यात सर्वत्र रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. दुष्काळी तालुके म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांमध्येदेखील जोरदार बरसलेल्या पावसामुळे तेथील शेतकरी समाधानी झालेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या जल प्रकल्पांपैकी जवळपास २३ प्रकल्पांमधील साठा शंभय टक्क्यांवर पोहोचला असून, सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.यंदा हंगामात १६४४.८५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील सरासरी पावसापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे १०७५.७७ मि.मी. इतके असते. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या परतीच्या पावसानेदेखील जिल्ह्यातील पावसाचे समीकरण बदलून टाकले आहे. साधारणपणे आॅक्टोबरमध्ये सरासरी ९३५ मि.मी. इतके पर्जन्यमान होत असते. परंतु यंदा केवळ २३ तारखेपर्यंत ११५२ मि.मी.पर्यंत पावसाचे प्रमाण पोहोचले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बरसलेल्या परतीच्या पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचेदेखील नुकसानझालेले आहे. हवामान खात्याने येत्या ३० तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला असून, पावसाची टक्केवारी अधिक वाढण्याची शक्यता आहे.बुधवारीदेखील जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. विशेषत: इगतपुरी, कळवण, निफाड, देवला या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र पावसानी नोंद झाली नाही. सायंकाळनंतर आभाळ कोळेकुट्ट झाल्याने रात्रीतून पाऊस पडण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.बुधवारी झालेले पावसाचे प्रमाणनाशिक (३.३.), इगतपुरी (३१.०), दिंडोरी (३.८), पेठ (३.०), त्र्यंबकेश्वर (०.०), मालेगाव (१०.०), नांदगाव (७.०), चांदवड (१९.०), कळवण (२१.०), बागलाण (१०.०), सुरगाणा (१.३), देवळा (३८.२), निफाड (६९.९), सिन्नर (४.०), येवला (२२.० मि.मी.) अशी पावसाची नोंद झालेली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती