शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

परतीचा पाऊस आॅक्टोबरमध्येही अधिक; मुक्काम आणखी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:25 IST

यंदा पावसाची कृपादृष्टी बरसल्याने राज्यातील धरणे आणि पाणलोट क्षेत्रांची तहान भागली आहे, तर मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर होणारे वाद पुढीलवर्षी टळण्याची सकारात्क बाब या पावसामुळे घडून आलेली आहे.

नाशिक : यंदा पावसाची कृपादृष्टी बरसल्याने राज्यातील धरणे आणि पाणलोट क्षेत्रांची तहान भागली आहे, तर मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर होणारे वाद पुढीलवर्षी टळण्याची सकारात्क बाब या पावसामुळे घडून आलेली आहे. नाशिक जिल्ह्यावरील पावसाची कृपा अजूनही कायम असून, जिल्ह्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याची सरासरीदेखील ओलांडली आहे. जवळपास २१७ मि.मी. अधिक पाऊस या महिन्यात कोसळला असून, येत्या चार-पाच दिवसांत यात आणखी वाढ होण्याचीदेखील शक्यता आहे.यंदा जिल्ह्यात सर्वत्र रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. दुष्काळी तालुके म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांमध्येदेखील जोरदार बरसलेल्या पावसामुळे तेथील शेतकरी समाधानी झालेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या जल प्रकल्पांपैकी जवळपास २३ प्रकल्पांमधील साठा शंभय टक्क्यांवर पोहोचला असून, सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.यंदा हंगामात १६४४.८५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील सरासरी पावसापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे १०७५.७७ मि.मी. इतके असते. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या परतीच्या पावसानेदेखील जिल्ह्यातील पावसाचे समीकरण बदलून टाकले आहे. साधारणपणे आॅक्टोबरमध्ये सरासरी ९३५ मि.मी. इतके पर्जन्यमान होत असते. परंतु यंदा केवळ २३ तारखेपर्यंत ११५२ मि.मी.पर्यंत पावसाचे प्रमाण पोहोचले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बरसलेल्या परतीच्या पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचेदेखील नुकसानझालेले आहे. हवामान खात्याने येत्या ३० तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला असून, पावसाची टक्केवारी अधिक वाढण्याची शक्यता आहे.बुधवारीदेखील जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. विशेषत: इगतपुरी, कळवण, निफाड, देवला या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र पावसानी नोंद झाली नाही. सायंकाळनंतर आभाळ कोळेकुट्ट झाल्याने रात्रीतून पाऊस पडण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.बुधवारी झालेले पावसाचे प्रमाणनाशिक (३.३.), इगतपुरी (३१.०), दिंडोरी (३.८), पेठ (३.०), त्र्यंबकेश्वर (०.०), मालेगाव (१०.०), नांदगाव (७.०), चांदवड (१९.०), कळवण (२१.०), बागलाण (१०.०), सुरगाणा (१.३), देवळा (३८.२), निफाड (६९.९), सिन्नर (४.०), येवला (२२.० मि.मी.) अशी पावसाची नोंद झालेली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती