शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:53 IST

मागील २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक २७.५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५३ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील २४ तासांत पावसाची रिपरीप सुरू आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक २७.५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५३ मिमी पाऊस वरूड तालुक्यात पडला. या रिमझीम पावसाने शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने जिल्ह्यासह विभागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० आॅगस्ट या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४३७.४ मिमी पाऊस पडला आहे. ही ६८.९ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेत ७५४.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ३७६.२ मिमी, भातकुली ३५९.६, नांदगाव ४०४.४, चांदूररेल्वे ४७६.५, धामणगाव ३९१.८, तिवसा ४५९.८, मोर्शी ४६३.६, वरूड ५४४, अचलपूर ३१५.१, चांदूरबाजार ३८८.६, दर्यापूर ३३५.५, अंजनगाव सुर्जी २५४.१, धारणी ५५८७.९ व चिखलदरा तालुक्यात ७६६ मिमी पाऊस पडला आहे. पावसाच्या सरासरीत सर्वाधिक ८०.७ टक्के पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात, तर कमी ५२.९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडला आहे.जिल्ह्यात अद्याप एकाही तालुक्याने पावसाची सरासरी गाठलेली नाही. धरणक्षेत्रातदेखील पाऊस नसल्याने प्रकल्पांच्या पातळीत वाढ झालेली नाही.मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: अचलपूर उपविभागातील तीन तालुक्यांतील पिकांना संजीवनी मिळाली आहे. अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यांना पावसामुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना याचा फायदा होईल. वरूड तालुक्यातील संत्राबागांना मृग बहरासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीन फुलावर असल्यामुळे हा पाऊस या पिकासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस आल्यास सोयाबीनचे भरगोस उत्पादन होईल. कपाशीसाठीदेखील आलेला पाऊस महत्त्वाचा ठरला आहे.