शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव परिसरात पावसाचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:43 IST

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने पिंपळगाव सह संपूर्ण तालुक्यातील पिकांवर थैमान घालत शेतकऱ्यांना मरो की जगो करून सोडले आहे. एकीकडे राज्यातील मंत्री नुकसाग्रस्त भागात पाहणी करून गेले आणि मंत्र्यांनी पाठ फिरताच शुक्र वारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाला सुरु वात झाली व आतापर्यंत पिंपळगाव बसवंत परिसरात कमी वेळात ७५.३ टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देद्राक्ष बागेला आले तलावाचे स्वरूप शेतकरी हवालदिल

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने पिंपळगाव सह संपूर्ण तालुक्यातील पिकांवर थैमान घालत शेतकऱ्यांना मरो की जगो करून सोडले आहे. एकीकडे राज्यातील मंत्री नुकसाग्रस्त भागात पाहणी करून गेले आणि मंत्र्यांनी पाठ फिरताच शुक्र वारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाला सुरु वात झाली व आतापर्यंत पिंपळगाव बसवंत परिसरात कमी वेळात ७५.३ टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील प्रवीण डेरे यांच्या अडीच एकर द्राक्ष बागेत गुढघ्याच्या वरती पाणी असल्याने या बागेत पूर स्थिती निर्माण झाली असल्याने या बागांना तलावाचे स्वरूप आले आहे. या द्राक्ष बाग वाचवण्यासाठी पानमोटार टाकून पाणी काढण्याची धडपड ते करीत आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील पाचोरे वणी, लोणवडी, कारसुळ, दावचवाडी, उंबरखेड, मुखेड, शिरवाडे वणी, अंतरवेली आदी गावाबरोबरच इतरही भागात शुक्र वारी (दि.१) रात्री बेमोसमी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यात महिन्याभरापासून रोजच पाऊस अन् रोजच फवारणी सुरू असल्याने पीक पूर्ण होईपर्यंत लागणारे औषध फवारणीचा खर्च सुरवातीला लागल्याने नवीन औषधे घेण्यासाठी शेतकऱ्यांना उसनवारीने पैसे घ्यावे लागत आहे.त्यातच शेतातून पाणी बाहेर काढणे, अडकलेला ट्रॅक्टर काढणे शिवाय कुटुंबासह मजुरांचेही हाल त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाने कर्जमाफीचा अथवा भरपाई देण्याचा तात्काळ निर्णय घेतला जावा अशी शेतकरी प्रतिक्षा करीत आहे.छाटणी केलेल्या द्राक्षबागा व नविन फुटवा निघत असलेल्या, पोगा आणि फुलोरा तसेच मणी धरण्याच्या अवस्थेतील द्राक्षबागांचे आतोनात नुकसान झाले असून शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, मका, टोमॅटो या पिकांची नासाडी या सततच्या पावसाने होत आहे. यात दररोज पडणाºया पावसाचे प्रशासन कितीवेळा आणि कसे पंचनामे करणार हा देखील प्रश्न शेतकºयांना सतावत असून शासनाने आता सरसकट कर्जमाफी करावी अशी परिस्थिती व मागणी शेतकरी करीत आहेत.अजून तीन ते चार दिवस पावसाची शक्यता....हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजुन तीन ते चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे हातात कोणतेच पिक शिल्लक राहणार नाही. द्राक्ष उत्पादकांचे हाल शब्दात व्यक्तच करता येणार नाही. द्राक्ष उत्पादकांच्या संघर्षाला अन् सहनशीलतेला आता मर्यादा राहिलेल्या नाहीत.आतापर्यंतच्या झालेल्या पावसाच्या तुलनेत शुक्र वारी झालेल्या पावसाचे प्रमाण सर्वाधिक होते. ज्या बागा आतापर्यत वाचवल्या होत्या, त्याचे देखील प्रचंड नुकसान झाली आहे. आणि ही नुकसान न भरून निघणारी आहे. शासनाला जर खरंच शेतकºयांचे हित असेल तर अनुदान देऊन शेतकºयांच्या जखमेवर मीठ न चोळता सरसगट कर्जमाफी करावी. नाहीतर येणाºया काळात शेतकºयांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.- प्रवीण डेरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.पाऊस थांबेना अन् थांबलाच तर शेतकºयांचा निसर्गाशी लढाही संपेना अशा अवस्थेत द्राक्ष उत्पादक अडकला आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात पिकांचे नुकसान झाली आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसानीच्या तुलनेत भरपाई देण्याऐवजी सरसकट कर्जमाफी करावी.- मनोज खोडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी