शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

By admin | Updated: June 9, 2017 01:18 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.येवला येथे मृग नक्षत्राच्या हलक्या सरींनी तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात पावसाची सुरु वात झाली. मात्र शहरासह मध्य भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.दुपारी ३ वाजेनंतर पावसास हलक्या सरींनी सुरु वात झाली. त्यांनतर दिलेल्या उघडीपाने चिंतेत भर पडण्यास सुरु वात झाली. मागील वर्षा प्रमाणे मृग नक्षत्र कोरडेच जाते की काय, अशा चर्चेस सुरु वात झाली, परंतु हलक्या सरींनी पुन्हा समाधान दिसण्यास सुरु वात झाली आहे. बळीराजा शेतीची कामे आटोपून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतानाच मृग नक्षाच्या मुहूर्तावर मेघराजाने तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. पावसाचा लहान मुलांनी मनमुराद आनंद घेतला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु येवला शहराचा १० किमी परिघाचा भाग नेहमी पावसापासून वंचित राहिल्याचा इतिहास आहे. यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चांगल्या मान्सूची शक्यता असली तरी बळीराजा शेतीची कामे आटोपून पेरणीसाठी चातकाप्रमाणे मेघराजाची वाट पाहत आहे.सकाळपासून ढगाळ वातावरण असतानाच दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक रिमझिम पावसाला सुरु वात झाली. ग्रामीण भागात झालेल्या या रिमझिम मृगसरींचा आस्वाद बच्चे कंपनींनी मनमुराद लुटला. या पावसाने वातावरणात निर्माण झालेली प्रचंड उष्णतेची लाट ओसरून काही प्रमाणात थंडावा निर्माण झाला. यामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही अंशी सुटका झाली आहे. पावसाच्या आगमन झाल्याने बळीराजाच्या खरीपाच्या पेरणीसाठी आशा पल्लवीत होऊन बियाणे व खते खरेदीसाठी तो सज्ज झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र येवला शहरात पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा यंदा बळीराजा करत आहे. लासलगाव परिसरात पावसाची दमदार सुरु वातलासलगाव व परिसरात गुरूवारी दुपारनंतर दमदार पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. लासलगाव व शहर परिसरात गुरूवारी पावसाने हजेरी लावली. पावसाची गरज असल्याने व मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर लागलीच दमदार पावसाने शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे . पिक पेरणीसाठी जमीन चांगली ओलसर असावी लागते. पेरणीला पोषक वातावरण झाल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. दमदार पाऊस सुरू झाल्याने शेतात अनेक ठिकाणी पावसामुळे डबकी साचली होती. ग्रामीण भागांत पडलेला पाऊस खरीप हंगामाच्या तयारीला पोषक ठरणार आहे. जोरण परिसरात मुसळधार पाऊसबागलाण तालुक्यातील जोरण, विंचुरे, कंधाणा, निरपुर, वटार आदि ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक अलेलेल्या पावसाणे शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या सात ते आठ दिवसांपासुन संपावर गेलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.