शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:35 IST

मालेगाव शहर परिसरात शनिवारी (दि.१९) दुपारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधारेमुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचून तळे निर्माण झाले होते. चालकांना या तळ्यांमधून वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल : शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्त्यांची दुरवस्था

मालेगाव : शहर परिसरात शनिवारी (दि.१९) दुपारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधारेमुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचून तळे निर्माण झाले होते. चालकांना या तळ्यांमधून वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते.शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून चिखल झाला असून, नागरिकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावा लागत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या मोकळ्या तळघरांमध्ये पाणी जमा झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असून, डेंग्यू- डायरिया यासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. अनेक रुग्णांवर आजही खासगी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू असून, त्यात पुन्हा ढगाळ हवामान आणि रिपरिप सुरू झाल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते उघडले आहेत. महापालिकेतर्फे डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. मात्र पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने हे खड्डे उघडे पडले आहेत. जुना आग्रा रोडवरून नव्या बसस्थानकाकडे जाणे वाहनधारकांना नकोसे झाले आहे. तालुक्यात खरिपाची पिके चांगले आले असताना रिपरिप पावसामुळे शेतात काढून ठेवलेली बाजरी व इतर पिके भिजुन शेतकऱ्यांचा हातचा घास हिरावून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.पावसामुळे बळीराजा हतबलअस्ताणे : अस्ताणेसह परिसरात यावर्षी पावसाने सुरूवातीला जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीच्या पीक काढणी कामात व्यस्त झाला असताना पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केल्याने बळीराजा हतबल झाला आहे.२५ वर्षानंतर प्रथमच असा पाऊस पहायला मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतीचे कामे खोळंबली होती. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामे शेतकºयांना करता येत नव्हती. त्यामुळे शेतात पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत झाली आहे. पावसाने दहा ते पंधरा दिवसांपासून उसंत घेतल्याने शेतकरी आपले कामे आवरण्यात व्यस्त आहेत. एकदम कामे आल्याने कपाशी निंदणे, कांदे लागवड, कांदे निंदणी, मका कापणी अशी एकदमच कामे आल्याने मजुरांची तोलातोल करावी लागत आहे. काम जास्त असल्याने मजुरीही वाढली आहे. त्यामुळे शेतकºयांचे नाके नऊ येत आहे.बाजरी, ज्वारी, मका कापणीसाठी ३०० रुपये प्रमाणे मजुर लागत आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु आले पिके कापणी करुन दुसºया पिकात उत्पादनाची कसर निघुन जाईल म्हणून गहु, हरभरा, कांदे लागवड करण्यासाठी शेतकरी शेत तयार करताना दिसत आहेत. दिवाळी जवळ आल्याने लवकरात लवकर कशी कामे आवली जातील याकडे शेतकºयांचा कल आहे; परंतु मजुरांअभावी शेतकºयांना स्वत:च लवकरच उठून आपली कामे करावी लागत आहे.काही शेतकरी राममाने, पुरमेपाडा, कौळाणे अशा ठिकाणाहून मजुर आणत आहेत. त्याला प्रत्येकी दोनशेरुपये रोज व मुकादमाला प्रत्येक मजुरामागे दहा रुपये आणि गाडीभाडे वेगळे लागत आहे. शेतीचे कामे जर वेळेत पूर्ण केली नाही तर मजुरीही जास्त लागतात. त्यामुळे मजुरवर्ग प्रत्येक वर्षी आपल्या मजुरी वाढवून घेत आहे. शेतकºयांना पर्याय नसल्याने पैसेद्यावे लागत आहे. आता पुन्हा पावसाची उघडीप कधी मिळेल या चिंतेत शेतकरी आहेत.परिसर हिरवागारमालेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाची पिके चांगली आली असून शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसामुळे परिसर हिरवागार झाला असून जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही सुटला आहे. दरम्यान शनिवारपासून पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केल्यामुळे शेतकºयांनी काढून ठेवलेल्या बाजरीसह खरीप पिके भिजल्याने धोक्यात आली आहे. समाधानकारक पावसामुळे नद्या, नाले वाहत असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे.ंगेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकºयांना अडचणींना सामोरे जावे लागतले होते. यावर्षी नदी, नाले, विहिरी, केटीवेअर पाण्याने भरलेले आहेत. त्यामुळे रब्बी पिके यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी घेताना दिसत आहेत.ं४दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतातील कामे लवकरात लवकर कशी होतील याकडे शेतकºयांचा कल आहे. कारण दिवाळीमुळे मजुरवर्ग काम करत नाही. त्यामुळे दिवाळीच्या अगोदरच कामे आटोपत आहे.ं४मजुरवर्ग मोठ्या प्रमाणात ऊस तोडण्यासाठी बाहेरगावीही जात असतात. दिवाळी झाल्यानंतर अस्ताणे, राजमाने, लखाणे, टोकडे आदि गावातील मजुर हे ऊस तोडणीसाठी बाहेरगावी जात असतात.त्यामुळे शेतीची कामे दिवाळीच्या अगोदरच शेतकºयांना आवरावी लागत आहेत. जादा दर देऊन शेतकºयांना मजुर आणावे लागत आहेत.मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गुरांच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवRainपाऊस