शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

पावसाने कोट्यवधींना धुतले

By admin | Updated: August 5, 2016 01:18 IST

पुराचा फटका : फर्निचर, विक्रीच्या वस्तू भिजल्या; आठ फुटांपर्यंत दुकानांमध्ये पाणी

नाशिक : गेल्या मंगळवारी आलेल्या महापुराचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजार, कापड बाजारात शिरल्याने संपूर्ण बाजारपेठेला पुराचा वेढा पडला होता. सराफी व्यावसायिकांच्या जवळपास तीनशेहून अधिक दुकानांसह भांडी-कापड बाजारातील सर्व दुकाने पाण्याखाली गेली होती. या पुराचा फटका बाजारपेठेला मोठ्या प्रमाणावर बसला असून, कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सराफी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये सुमारे आठ फुटापर्यंत पाणी साचल्याने सर्व फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, वायरिंग, पीओपी, बल्ब, मांडण्या, खुर्च्यांची दुर्दशा झाली आहे. पाण्यामध्ये सर्व दुकाने बुडाल्यामुळे संपूर्ण बाजारपेठच कोलमडून पडली आहे. बुधवारी सकाळपासून तर गुरुवारपर्यंत (दि.४) बहुसंख्य विक्रेत्यांकडून दुकानांची आवरासावर सुरू होती. बाजारपेठेतील व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे. कापड व भांडी विक्रेत्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. चिखलाने दुकानांमधील संपूर्ण माल माखला आहे. त्यामुळे कापडाची विक्री करणेही अवघड होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तसेच भांडी बाजारात विक्रेते मागील दोन दिवसांपासून चिखलाने भरलेली भांडी धूत पुन्हा चकाकी देण्याचा प्रयत्न करताना दिसून आले; मात्र भांड्यांचे नावीन्य हरपल्याने निम्म्या किमतीत विक्री क रण्यास गुरुवारी दुपारनंतर विक्रेत्यांनी सुरुवात केली.२००८च्या तुलनेने यावर्षी महापुराच्या पाण्याने खूप नुकसान झाले नाही. कारण आपत्ती व्यवस्थापनाकडून पुराच्या अगोदरच संपूर्ण बाजारपेठांमध्ये सतर्कतेचा इशारा देत विक्रीच्या वस्तू व अन्य साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढेपर्यंत जे व्यापारी मंगळवारी शहरात होते त्यांनी तत्काळ विक्री मालाचे स्थलांतर केले; मात्र फर्निचर व अन्य वस्तू हलविणे बहुसंख्य विक्रेत्यांना शक्य झाले नाही आणि जे व्यापारी मंगळवारच्या सुटीमुळे बाहेरगावी गेलेले होते त्यांना पुराचा अधिक फटका बसला. (प्रतिनिधी)