शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरविली; १७ गावांना टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 01:38 IST

जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र पावसाने काहीशी चिंता वाढविली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची स्थिती : ऑगस्टच्या पंधरवड्यानंतरही सहा तालुके कोरडेच

नाशिक : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र पावसाने काहीशी चिंता वाढविली आहे.

मागीलवर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गाव खेड्यांमध्ये पाण्याची पातळी चांगली होती. त्यामुळे उन्हाळ्यात मे महिन्यांपर्यंत टँकर्स सुरू करण्याची वेळ आली नव्हती. मात्र, मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात काही तालुक्यांकडून टॅंकर्सची मागणी होऊ लागली. जुलैच्या प्रारंभी जिल्ह्यात ४८ टँकर्स सुरू होते. ऑगस्टमध्ये जिल्हा टँकरमुक्त होईल असे वाटत असतांना टँकर्सची तीव्रता वाढतच असल्याने टंचाई निवारण उपाययोजनेला मुदतवाढ देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ टॅंकर सुरू आहेत.

यंदा अपेक्षित पाऊस होत नसल्याने अजूनही अनेक तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाची रिमझिम आणि अधून मधून कोसळणाऱ्या पावसामुळे काहीसा दिलासा असला तरी पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून-जुलै मध्ये देखील अपेक्षित पाऊस होऊ शकला नाही. कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत गेली. मात्र, पावसाचे सातत्य नसल्याने अनेक गावांमध्य टँकर्स सुरूच होते. आषाढी एकादशीनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ टॅंकर सुरू असून बागलाण, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये पाऊस कमी असल्याने टॅंकर्स वाढण्याची शक्यता आहे.

नांदगाव, येवला या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी तीन टॅंकर सुरू आहेत. तर देवळा तालुक्यात दोन तर मालेगाव व नांदगावमध्ये प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहेत. दिवसभरात टॅंकरच्या २७ फेऱ्या सुरू आहेत. एकूण १७ गावे व एक वाडी या ठिकाणी टँकर्स सुरू आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई