शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

पावसाने पाठ फिरविली; १७ गावांना टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 01:38 IST

जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र पावसाने काहीशी चिंता वाढविली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची स्थिती : ऑगस्टच्या पंधरवड्यानंतरही सहा तालुके कोरडेच

नाशिक : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र पावसाने काहीशी चिंता वाढविली आहे.

मागीलवर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गाव खेड्यांमध्ये पाण्याची पातळी चांगली होती. त्यामुळे उन्हाळ्यात मे महिन्यांपर्यंत टँकर्स सुरू करण्याची वेळ आली नव्हती. मात्र, मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात काही तालुक्यांकडून टॅंकर्सची मागणी होऊ लागली. जुलैच्या प्रारंभी जिल्ह्यात ४८ टँकर्स सुरू होते. ऑगस्टमध्ये जिल्हा टँकरमुक्त होईल असे वाटत असतांना टँकर्सची तीव्रता वाढतच असल्याने टंचाई निवारण उपाययोजनेला मुदतवाढ देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ टॅंकर सुरू आहेत.

यंदा अपेक्षित पाऊस होत नसल्याने अजूनही अनेक तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाची रिमझिम आणि अधून मधून कोसळणाऱ्या पावसामुळे काहीसा दिलासा असला तरी पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून-जुलै मध्ये देखील अपेक्षित पाऊस होऊ शकला नाही. कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत गेली. मात्र, पावसाचे सातत्य नसल्याने अनेक गावांमध्य टँकर्स सुरूच होते. आषाढी एकादशीनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ टॅंकर सुरू असून बागलाण, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये पाऊस कमी असल्याने टॅंकर्स वाढण्याची शक्यता आहे.

नांदगाव, येवला या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी तीन टॅंकर सुरू आहेत. तर देवळा तालुक्यात दोन तर मालेगाव व नांदगावमध्ये प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहेत. दिवसभरात टॅंकरच्या २७ फेऱ्या सुरू आहेत. एकूण १७ गावे व एक वाडी या ठिकाणी टँकर्स सुरू आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई