शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन येऊ लागले पुर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:27 IST

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

ठळक मुद्देनद्या प्रभावित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.नायगाव खाºयात सलग पंधरा दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझीरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावातील कोबी, फ्लावर, टमाटे, मिरची, मका, बाजरी, सोयाबीन आदींसह भाजीपाल्यांचे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पिके सडून घाण झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेताचेही मोठे नुकसान झाले आहे.गेल्या पंधरा दिवसापासून पडणाºया कमी-अधिक पावसामुळे खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकºयांसह शेतमजुर, शालेय विद्यार्थी, चाकरमाने आदीं बरोबर जनावरांचे चांगलेच हाल झाले होते. मंगळवारी दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने शेतकºयांनी रेंगाळलेली शेती कामे हाती घेतल्याचे चित्र बघायला मिळाले.दरम्यान गेल्या पंधरा दिवसानंतर मंगळवारी सकाळी नायगाव खोºयातील ग्रामस्थांना सुर्यदर्शन झाले. दिवसभर पावसाची रिप-रिप व गारहवेमुळे शेताबरोबर घराचे पत्रेही कमकुवत झाले आहे. दिवसभर निर्माण होणाºया ढगाळ वातावरणामुळे व उन्हा अभावी नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आज झालेल्या सुर्यदर्शनाने व अनेक दिवसांनी परिसरातील नद्या प्रभावित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.महागडी बी-बियाणे, किटकनाशके, खते व मेहनत करून पिकविलेले विविध पीक आधी पाणी टंचाईमुळे व आता अतिपावसामुळे शेतातच सडल्याने बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसाळले आहे. नायगाव खोºयात पडलेल्या या पावसामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गोदावरी व दारणेला आलेल्या महापुरात नदीकाठचे शेकडो कृषीपंप वाहून गेल्याने शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरताच शेतकºयांनी नदीच्या काठावर पंप शोधण्यासाठी गर्दी होत आहे.