शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन येऊ लागले पुर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:27 IST

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

ठळक मुद्देनद्या प्रभावित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.नायगाव खाºयात सलग पंधरा दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझीरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावातील कोबी, फ्लावर, टमाटे, मिरची, मका, बाजरी, सोयाबीन आदींसह भाजीपाल्यांचे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पिके सडून घाण झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेताचेही मोठे नुकसान झाले आहे.गेल्या पंधरा दिवसापासून पडणाºया कमी-अधिक पावसामुळे खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकºयांसह शेतमजुर, शालेय विद्यार्थी, चाकरमाने आदीं बरोबर जनावरांचे चांगलेच हाल झाले होते. मंगळवारी दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने शेतकºयांनी रेंगाळलेली शेती कामे हाती घेतल्याचे चित्र बघायला मिळाले.दरम्यान गेल्या पंधरा दिवसानंतर मंगळवारी सकाळी नायगाव खोºयातील ग्रामस्थांना सुर्यदर्शन झाले. दिवसभर पावसाची रिप-रिप व गारहवेमुळे शेताबरोबर घराचे पत्रेही कमकुवत झाले आहे. दिवसभर निर्माण होणाºया ढगाळ वातावरणामुळे व उन्हा अभावी नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आज झालेल्या सुर्यदर्शनाने व अनेक दिवसांनी परिसरातील नद्या प्रभावित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.महागडी बी-बियाणे, किटकनाशके, खते व मेहनत करून पिकविलेले विविध पीक आधी पाणी टंचाईमुळे व आता अतिपावसामुळे शेतातच सडल्याने बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसाळले आहे. नायगाव खोºयात पडलेल्या या पावसामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गोदावरी व दारणेला आलेल्या महापुरात नदीकाठचे शेकडो कृषीपंप वाहून गेल्याने शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरताच शेतकºयांनी नदीच्या काठावर पंप शोधण्यासाठी गर्दी होत आहे.