शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन येऊ लागले पुर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:27 IST

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

ठळक मुद्देनद्या प्रभावित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येऊ लागले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.नायगाव खाºयात सलग पंधरा दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझीरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावातील कोबी, फ्लावर, टमाटे, मिरची, मका, बाजरी, सोयाबीन आदींसह भाजीपाल्यांचे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पिके सडून घाण झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेताचेही मोठे नुकसान झाले आहे.गेल्या पंधरा दिवसापासून पडणाºया कमी-अधिक पावसामुळे खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकºयांसह शेतमजुर, शालेय विद्यार्थी, चाकरमाने आदीं बरोबर जनावरांचे चांगलेच हाल झाले होते. मंगळवारी दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने शेतकºयांनी रेंगाळलेली शेती कामे हाती घेतल्याचे चित्र बघायला मिळाले.दरम्यान गेल्या पंधरा दिवसानंतर मंगळवारी सकाळी नायगाव खोºयातील ग्रामस्थांना सुर्यदर्शन झाले. दिवसभर पावसाची रिप-रिप व गारहवेमुळे शेताबरोबर घराचे पत्रेही कमकुवत झाले आहे. दिवसभर निर्माण होणाºया ढगाळ वातावरणामुळे व उन्हा अभावी नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आज झालेल्या सुर्यदर्शनाने व अनेक दिवसांनी परिसरातील नद्या प्रभावित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.महागडी बी-बियाणे, किटकनाशके, खते व मेहनत करून पिकविलेले विविध पीक आधी पाणी टंचाईमुळे व आता अतिपावसामुळे शेतातच सडल्याने बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसाळले आहे. नायगाव खोºयात पडलेल्या या पावसामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गोदावरी व दारणेला आलेल्या महापुरात नदीकाठचे शेकडो कृषीपंप वाहून गेल्याने शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरताच शेतकºयांनी नदीच्या काठावर पंप शोधण्यासाठी गर्दी होत आहे.