शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

पावसाचा टमाट्याबरोबरच द्राक्षबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:05 IST

वणी : सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे टमाट्यासह द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

वणी : सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे टमाट्यासह द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था करु ण व दु:खदायी झाली आहे. सोमवारी वणी शहर व परिसरात पावसाने हाहाकार केला. अनेक रहिवाशांचे पुराचे पाणी घर व गुदामामध्ये शिरल्याने मोठी आर्थिक हानी झाली. प्रशासकीय व्यवस्थेने पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. शहरात पावसाचे आगमन होण्यापुर्वी रावळा जावळा डोंगर सप्तशृंगगडाच्या पर्वतरांगा मार्कंडेय पर्वत शितकडा ( सतीचा कडा) या ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. उंच सखल भागात झालेल्या पावसाने रौद्र स्वरु प धारण केले होते. पावसाचे थेंब हे मोठ्या आकाराचे होते व पावसाचा वेग असामान्य होता. बंगले घरे व इतर निवासस्थानाच्या छतावर पाणी मावत नव्हते. काही जाणकारांच्या मते गेल्या चाळीस वर्षात असा पाऊस झाला नाही तर काही जुण्या जाणत्यांनी हा पाऊस म्हणजे ढगफुटीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वणी, मावडी, मुळाणे, बाबापुर, संगमनेर, भातोडे ,चंडिकापुर तसेच वणी कळवण रस्त्यावरील शेतकरी बांधवांना याचा फटका बसला.दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने टमाटा व द्राक्ष अशी नगदी पिके घेण्यात येतात प्रारंभीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. कसाबसा पाऊस सुरु झाला पावसाने जोर पकडला. तालूक्यातील धरणे पुर्ण क्षमतेने भरली. विहीरी पुर्णत: भरल्या. नद्या नाले दुथडी भरु न वाहु लागले. थोडक्यात शेती व्यवसायाला अनुकुल स्थिती निर्माण झाली. या सर्व बाबी लक्षात घेऊन शेती व्यवसायाचे काम नियोजनबद्ध सुरु असताना सोमवारच्या पावसाने दाणाफाण केली.

टॅग्स :Nashikनाशिक