शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रेल्वेसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:09 IST

कल्याण येथील पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी (दि.१८) सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली त्याचा फटका नाशिकच्या प्रवाशांनाही बसला. पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकऐवजी दौंडमार्गे धावली. दुपारी साडेतीननंतरही वाहतूक सुरळीत झाली नाही. मात्र सायंकाळी वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली.

ठळक मुद्देपत्री पुलाचा परिणाम : पंचवटी, गोदावरीसह अनेक गाड्या रद्द

नाशिकरोड : कल्याण येथील पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी (दि.१८) सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली त्याचा फटका नाशिकच्या प्रवाशांनाही बसला. पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकऐवजी दौंडमार्गे धावली. दुपारी साडेतीननंतरही वाहतूक सुरळीत झाली नाही. मात्र सायंकाळी वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली.मागील आठवड्यात इगतपुरी रेल्वेस्थानकात महिनाभर सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वेचे नुकसान झाले होते. आता कल्याणला विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. कल्याणचा विशेष मेगाब्लॉक असला तरी काही गाड्या नाशिकरोड स्थानकातून सकाळी धावल्या. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबईला न जाता नाशिकरोडपर्यंतच धावली. तेथूनच ती नागपूरला गेली. मुंबईहून पहाटे सुटलेली काशी एक्स्प्रेस सकाळी दहाला नाशिकरोडला आली. पवन आणि कामायनी एक्स्प्रेसही आल्या. सकाळी बनारस सुपर पावणे नऊला आली. देवळाली-भुसावळ शटल पहाटे पाचला गेली. भुसावळवरून सुटणारी हावडा-मुंबई एक्स्प्रेस, वाराणसी-एलटीटी आणि राजेंद्रनगर-पटना एक्स्प्रेस या गाड्या जळगाव-वसईरोड-दिवामार्गे धावली. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस,एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस याच मार्गाने भुसावळला गेली.जादा बसेस : रेल्वे प्रवाशांसाठी महामंडळाचे नियोजनदरम्यान, रेल्वे सेवा बंद असल्याने नाशिकरोड एसटी स्टॅन्डवर रविवारी गर्दी होती. या स्थानकातून आज पाचशे फेऱ्या झाल्या. त्यात लांबपल्ल्याच्या ३३० तर शहर बस वाहतुकीच्या २०० फेºयांचा समावेश होता. एसटी गाड्या मर्यादित असल्याने प्रवाशांची गाडीत जागा मिळविण्यासाठी चढाओढ होती.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीstate transportराज्य परीवहन महामंडळ