शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वे, एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:40 IST

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांपुढे पेच : अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागणार

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील विद्यार्थी तासन‌्तास अभ्यास करत आहेत. एमपीएससी परीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाच वेळा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या वयाबरोबरच मेहनतही वाया जात असल्याने विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले होते. तेव्हा शासनाने २१ मार्च रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली; पण याच तारखेला पूर्व नियोजित रेल्वे परीक्षा घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीमध्ये पार पडला. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २१ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यासावर भर दिला होता. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील परीक्षा दिली आहे, तर आता एकाच दिवशी एमपीएससी व रेल्वे परीक्षा येत असल्याने कोणती परीक्षा द्यावी आणि कोणती टाळावी हा पेच विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वर्षभर केलेला अभ्यास तसेच वर्ष वाया जाणार अशी हुरहूर लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले आहे.केंद्रावर पोहण्यासाठी कसरतरेल्वेच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र नसल्यामुळे त्यासाठी मुंबई, वाशी, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी लागेल. नाशिक आणि मुंबई अशा दोन बाजू असल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊन तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच आता कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्यामुळे काळजी घेण्याची आव्हान उभे आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अभ्यासिका आणि वाचनालय बंद असताना देखील विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जोमाने परीक्षेची तयारी केली. मात्र, ऐनवेळी दोन्ही आणि खासगी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.- रघुनाथ मोरे, परीक्षार्थी.आज स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतो. मात्र, एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे परीक्षेस हजर राहण्यासाठी मोठी तारांबळ होणार आहे.- संपत दोंदे, परीक्षार्थी.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा