शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रेल्वे, एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:40 IST

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांपुढे पेच : अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागणार

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील विद्यार्थी तासन‌्तास अभ्यास करत आहेत. एमपीएससी परीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाच वेळा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या वयाबरोबरच मेहनतही वाया जात असल्याने विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले होते. तेव्हा शासनाने २१ मार्च रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली; पण याच तारखेला पूर्व नियोजित रेल्वे परीक्षा घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीमध्ये पार पडला. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २१ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यासावर भर दिला होता. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील परीक्षा दिली आहे, तर आता एकाच दिवशी एमपीएससी व रेल्वे परीक्षा येत असल्याने कोणती परीक्षा द्यावी आणि कोणती टाळावी हा पेच विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वर्षभर केलेला अभ्यास तसेच वर्ष वाया जाणार अशी हुरहूर लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले आहे.केंद्रावर पोहण्यासाठी कसरतरेल्वेच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र नसल्यामुळे त्यासाठी मुंबई, वाशी, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी लागेल. नाशिक आणि मुंबई अशा दोन बाजू असल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊन तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच आता कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्यामुळे काळजी घेण्याची आव्हान उभे आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अभ्यासिका आणि वाचनालय बंद असताना देखील विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जोमाने परीक्षेची तयारी केली. मात्र, ऐनवेळी दोन्ही आणि खासगी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.- रघुनाथ मोरे, परीक्षार्थी.आज स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतो. मात्र, एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे परीक्षेस हजर राहण्यासाठी मोठी तारांबळ होणार आहे.- संपत दोंदे, परीक्षार्थी.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा