शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

रेल्वे, एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:40 IST

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांपुढे पेच : अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागणार

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील विद्यार्थी तासन‌्तास अभ्यास करत आहेत. एमपीएससी परीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाच वेळा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या वयाबरोबरच मेहनतही वाया जात असल्याने विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले होते. तेव्हा शासनाने २१ मार्च रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली; पण याच तारखेला पूर्व नियोजित रेल्वे परीक्षा घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीमध्ये पार पडला. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २१ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यासावर भर दिला होता. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील परीक्षा दिली आहे, तर आता एकाच दिवशी एमपीएससी व रेल्वे परीक्षा येत असल्याने कोणती परीक्षा द्यावी आणि कोणती टाळावी हा पेच विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वर्षभर केलेला अभ्यास तसेच वर्ष वाया जाणार अशी हुरहूर लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले आहे.केंद्रावर पोहण्यासाठी कसरतरेल्वेच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र नसल्यामुळे त्यासाठी मुंबई, वाशी, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी लागेल. नाशिक आणि मुंबई अशा दोन बाजू असल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊन तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच आता कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्यामुळे काळजी घेण्याची आव्हान उभे आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अभ्यासिका आणि वाचनालय बंद असताना देखील विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जोमाने परीक्षेची तयारी केली. मात्र, ऐनवेळी दोन्ही आणि खासगी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.- रघुनाथ मोरे, परीक्षार्थी.आज स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतो. मात्र, एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे परीक्षेस हजर राहण्यासाठी मोठी तारांबळ होणार आहे.- संपत दोंदे, परीक्षार्थी.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा