शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मल्याळी असोसिएशनतर्फे रेल्वेद्वारे मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:51 IST

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले.

नाशिकरोड : केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले.  केरळमध्ये अतिवृष्टी व पावसाच्या पुरामुळे फार वाताहत होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून श्री घंटी म्हसोबा मंदिरामागील एका मंगल कार्यालयात सर्व प्रकारची मदत गोळा करण्यात येत होती. अन्नधान्य, पाण्याच्या बाटलीचे बॉक्स, पाणी उपसा करणारे २५ पंप, कपडे आदी विविध प्रकारच्या जमा झालेल्या वस्तू, साहित्य तीन ट्रकमधून बुधवारी सायंकाळी रेल्वे माल धक्क्यावर आणण्यात आले. तेथून मालट्रकमधील सामान रेल्वे वाहतुकीच्या दोन व्हीपीमधून लागलीच मुंबईला रवाना करण्यात आले. केरळ पूरग्रस्तांना पाठविण्यात येणारी मदत रेल्वे प्रशासनामार्फत मोफत पाठविण्यात येत आहे. नाशिकरोड वाणिज्य विभागाचे निरीक्षक कुंदन महापात्रा यांनी केरळ पूरग्रस्तांना सामान पाठविण्यासाठी तातडीने दोन व्हीपी उपलब्ध करून दिल्या आहेत.  यावेळी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशन नाशिकचे संस्थापक रणजित नायर, अध्यक्ष के.पी. कोशी, जॉर्जी पी. जॉन, दिनो मॅथ्यु, शिनु जोस, उत्तम पिल्ले, राईटसन् बर्नाल्ड, अर्जुन नायर, सुरेन्द्र नायर, रमय्या नायर, रश्मी नायर, वलंसरा नायर, एलिझाबेथ सत्येन, आशा बाबू, डिन्सी बाबू, राधा मोहन, शिवनारायण सोमाणी, कैलास भालेराव आदी उपस्थित होते.माथाडी कामगारांची मदतकेरळ पूरग्रस्तांना विविध संस्था, संघटना, समाजाकडून गोळा होणारी मदत ट्रक, टेम्पोमधून रेल्वे माल धक्क्यावर आल्यानंतर माथाडी कामगारांनीदेखील कुठलेही पैसे न घेता सदर माल, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये मोफत व्यवस्थित रचून भरून दिला. विशेष यापूर्वी गेलेल्या सातही व्हीपी या मध्यरात्री रेल्वे माल धक्क्यावर आल्यावर झोपेतून उठून माथाडी कामगारांनी रातोरात ट्रक, टेम्पोमधील सामान, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये भरून केरळ पूरग्रस्तांना मदत केली आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरfundsनिधी