शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मल्याळी असोसिएशनतर्फे रेल्वेद्वारे मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:51 IST

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले.

नाशिकरोड : केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले.  केरळमध्ये अतिवृष्टी व पावसाच्या पुरामुळे फार वाताहत होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून श्री घंटी म्हसोबा मंदिरामागील एका मंगल कार्यालयात सर्व प्रकारची मदत गोळा करण्यात येत होती. अन्नधान्य, पाण्याच्या बाटलीचे बॉक्स, पाणी उपसा करणारे २५ पंप, कपडे आदी विविध प्रकारच्या जमा झालेल्या वस्तू, साहित्य तीन ट्रकमधून बुधवारी सायंकाळी रेल्वे माल धक्क्यावर आणण्यात आले. तेथून मालट्रकमधील सामान रेल्वे वाहतुकीच्या दोन व्हीपीमधून लागलीच मुंबईला रवाना करण्यात आले. केरळ पूरग्रस्तांना पाठविण्यात येणारी मदत रेल्वे प्रशासनामार्फत मोफत पाठविण्यात येत आहे. नाशिकरोड वाणिज्य विभागाचे निरीक्षक कुंदन महापात्रा यांनी केरळ पूरग्रस्तांना सामान पाठविण्यासाठी तातडीने दोन व्हीपी उपलब्ध करून दिल्या आहेत.  यावेळी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशन नाशिकचे संस्थापक रणजित नायर, अध्यक्ष के.पी. कोशी, जॉर्जी पी. जॉन, दिनो मॅथ्यु, शिनु जोस, उत्तम पिल्ले, राईटसन् बर्नाल्ड, अर्जुन नायर, सुरेन्द्र नायर, रमय्या नायर, रश्मी नायर, वलंसरा नायर, एलिझाबेथ सत्येन, आशा बाबू, डिन्सी बाबू, राधा मोहन, शिवनारायण सोमाणी, कैलास भालेराव आदी उपस्थित होते.माथाडी कामगारांची मदतकेरळ पूरग्रस्तांना विविध संस्था, संघटना, समाजाकडून गोळा होणारी मदत ट्रक, टेम्पोमधून रेल्वे माल धक्क्यावर आल्यानंतर माथाडी कामगारांनीदेखील कुठलेही पैसे न घेता सदर माल, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये मोफत व्यवस्थित रचून भरून दिला. विशेष यापूर्वी गेलेल्या सातही व्हीपी या मध्यरात्री रेल्वे माल धक्क्यावर आल्यावर झोपेतून उठून माथाडी कामगारांनी रातोरात ट्रक, टेम्पोमधील सामान, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये भरून केरळ पूरग्रस्तांना मदत केली आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरfundsनिधी