शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

राहू-केतूचे शुक्लकाष्ठ संपणार, राजकीय बदल अन् कोरोनापासून भयमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 11:45 IST

ज्योतिषाचार्यांचे मत : राजकीय बदल अन् कोरोनापासून भयमुक्ती

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूजन्य साथीने ग्रासलेल्या जगाला एप्रिल महिना दिलासादायक आनंदवार्ता घेऊन येणार आहे. एप्रिल महिन्यात ९ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार असून, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत ज्योतिष तज्ज्ञांनी दिले आहेत. 

अनेकांच्या आयुष्यातील राहू-केतुचे शुक्लकाष्ठ संपणार असून राजकारणातही आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. विशेषत: ७ एप्रिल रोजी मंगळ बदलत असल्याने शनि व मंगळाची कोंडी सुटणार असून अनुकूल परिस्थिती निर्माण होणार असल्याचे मत नाशिक येथील ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. एप्रिल २०२२ मध्ये एक नव्हे तर ९ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ही एक अद्भुत खगोलीय घटना मानली जात असून त्याविषयी ज्याेतिषतज्ज्ञांनी चांगल्या परिणामांचे संकेत दिले आहेत. याबाबत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी सांगितले, राहू हा १६ मार्च रोजीच बदलला आहे. राहू व केतू हे एकाचवेळी बदलत असतात. तर रवी, बुध, शुक्र हे दर महिन्याला बदलतात. आता एप्रिल महिन्यात मंगळ व गुरू या ग्रहांचे राशी परिवर्तन होत असून त्यामुळे अनेक सकारात्मक बदल पाहावयास मिळणार आहेत. ७ एप्रिल रोजी मंगळ ग्रह बदलणार आहे तर गुरू हा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने बदल पाहावयास मिळणार आहेत. शनि व मंगळ हे दोन शत्रू आहेत. त्यांची कोंडी सुटणार आहे. त्यामुळे वैयक्तिक मानवी जीवनापासून राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषि, शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल स्थिती बघायला मिळणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण