शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वातावरणातील बदलामुळे रब्बी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:38 IST

सायखेडा : जिल्ह्यामध्ये पहाटेच्या वेळी धुके पसरत असले तरी ऐन हिवाळा असूनही केवळ कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण अद्याप सुरू आहे. याचा फटका रब्बीतील पिकांवर होत असून, गहू, हरभरा, ज्वारी पिके संकटात आली आहेत. एकीकडे वातावरणातील बदलांमुळे पीक अडचणीत आले असताना दुसरीकडे पिकांवर अळीचे आक्रमण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनके ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट गहिरे झाले आहे.

ठळक मुद्देगहू, हरभरा धोक्यात : दुबार पेरणीचे संकट, अळींचे संक्रमण

यंदा म्हणावा तसा हिवाळा अद्याप सुरू झालेला नाही. डिसेंबर अर्ध्याहून जास्त उलटून गेल्यानंतरही वातावरणात आवश्यक बदल झालेला नाही. शेतकऱ्यांनी खरिपातील मका पीक काढणीनंतर गहू, हरभरा, तूर, कांदा, लसूण आदी पिकांची मोठ्या उत्साहाने लागवड केली; मात्र वातावरणातील बदलामुळे ही पिके धोक्यात येत आहेत. या बदलामुळे सध्या गहू पिवळा पडू लागला आहे. त्याची वाढही खुंटली आहे. या मोसमाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. यानंतर मातीतील ओलावा निघून जाण्यास बराच अवधी लागल्याने पेरण्या उशिराने झाल्या होत्या. यानंतर सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा शेतकरी धरून होते; परंतु अद्याप वातावरणात आवश्यक गारवा निर्माण झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांनी खरिपानंतर जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने टोकन पद्धतीने गव्हाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने गहू पेरला; मात्र वातावरण साथ देत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊन-सावलीच्या खेळात गहू पिवळा पडू लागला आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीमध्ये भरून निघेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी रब्बी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहेत. सध्या सकाळी बऱ्याच वेळ धुके, दुपारच्या वेळी ऊन तर संध्याकाळी साधारण थंडी पडत आहे. हा बदल रब्बी पिकांसाठी त्रासदायक असल्याचे बोलले जाते. जाणकारांच्या मते, या अवस्थेत पिके करपतात, रोग पडण्याच्या आधीच्या अवस्थेत रोगाच्या चिपट्यादेखील करपतात. हरभरा सध्या फुले येण्याच्या अवस्थेत आहे. त्यास धुक्याचा विपरित परिणाम घडत असतो.किडींचाही धोका वाढला!पर्यावरणातील असमतोलामुळे एकीकडे पिकांची वाढ खुंटली असताना दुसरीकडे किडींचाही प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. पेरणी केलेल्या गहू पिकाने आता डोके वर काढले असताना अळीचे आक्रमण सुरू झाले आहे. या अळीने फुलांना पोखरण्याचे काम सुरू केले असल्याने अनेक कोंब जागेवरच गळून पडत आहेत. गहू आणि हरभऱ्याची सारखीच स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी