शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

वातावरणातील बदलामुळे रब्बी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:38 IST

सायखेडा : जिल्ह्यामध्ये पहाटेच्या वेळी धुके पसरत असले तरी ऐन हिवाळा असूनही केवळ कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण अद्याप सुरू आहे. याचा फटका रब्बीतील पिकांवर होत असून, गहू, हरभरा, ज्वारी पिके संकटात आली आहेत. एकीकडे वातावरणातील बदलांमुळे पीक अडचणीत आले असताना दुसरीकडे पिकांवर अळीचे आक्रमण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनके ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट गहिरे झाले आहे.

ठळक मुद्देगहू, हरभरा धोक्यात : दुबार पेरणीचे संकट, अळींचे संक्रमण

यंदा म्हणावा तसा हिवाळा अद्याप सुरू झालेला नाही. डिसेंबर अर्ध्याहून जास्त उलटून गेल्यानंतरही वातावरणात आवश्यक बदल झालेला नाही. शेतकऱ्यांनी खरिपातील मका पीक काढणीनंतर गहू, हरभरा, तूर, कांदा, लसूण आदी पिकांची मोठ्या उत्साहाने लागवड केली; मात्र वातावरणातील बदलामुळे ही पिके धोक्यात येत आहेत. या बदलामुळे सध्या गहू पिवळा पडू लागला आहे. त्याची वाढही खुंटली आहे. या मोसमाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. यानंतर मातीतील ओलावा निघून जाण्यास बराच अवधी लागल्याने पेरण्या उशिराने झाल्या होत्या. यानंतर सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा शेतकरी धरून होते; परंतु अद्याप वातावरणात आवश्यक गारवा निर्माण झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांनी खरिपानंतर जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने टोकन पद्धतीने गव्हाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने गहू पेरला; मात्र वातावरण साथ देत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊन-सावलीच्या खेळात गहू पिवळा पडू लागला आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीमध्ये भरून निघेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी रब्बी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहेत. सध्या सकाळी बऱ्याच वेळ धुके, दुपारच्या वेळी ऊन तर संध्याकाळी साधारण थंडी पडत आहे. हा बदल रब्बी पिकांसाठी त्रासदायक असल्याचे बोलले जाते. जाणकारांच्या मते, या अवस्थेत पिके करपतात, रोग पडण्याच्या आधीच्या अवस्थेत रोगाच्या चिपट्यादेखील करपतात. हरभरा सध्या फुले येण्याच्या अवस्थेत आहे. त्यास धुक्याचा विपरित परिणाम घडत असतो.किडींचाही धोका वाढला!पर्यावरणातील असमतोलामुळे एकीकडे पिकांची वाढ खुंटली असताना दुसरीकडे किडींचाही प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. पेरणी केलेल्या गहू पिकाने आता डोके वर काढले असताना अळीचे आक्रमण सुरू झाले आहे. या अळीने फुलांना पोखरण्याचे काम सुरू केले असल्याने अनेक कोंब जागेवरच गळून पडत आहेत. गहू आणि हरभऱ्याची सारखीच स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी