नाशिक : आदिवासी बांधवांकडून गोळा केली जाणारी वनौषधी, तसेच अन्य धान्य खरेदीबाबतच्या दरनिश्चितीसाठी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास महामंडळाची बैठक होऊन त्यात हिरड्याला क्ंिवटलला ३०० ते ११०० रुपयांपर्यंत भाव निश्चित करण्यात आला.आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. केंद्र शासनाने हिरड्याचा भाव निश्चित केला आहे. यापूर्वी हे दर ठरविण्याचे अधिकार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांचे होते. बाजारपेठेच्या चढ-उतारानुसार हे भाव ठरत होते. त्यामुळे हिरडा गोळा करण्याऱ्यांचे नुकसान होत होते. आता मात्र केंद्र शासनानेच भाव निश्चित करून दिला आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा त्यात फायदा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे दर निश्चित करण्यात आले. त्यानुसार हिरडा कळीसाठी किलोला ११ रुपये तर क्विंटलला ११०० रुपये तसेच हिरड्याच्या सभ्रास नंबर एकसाठी क्ंिवटलला ८०० रुपये तर दोन ग्रेडसाठी ६०० आणि तीन नंबर ग्रेडसाठी ३०० रुपये भाव निश्चित करण्यात आला. राज्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत राजगुरूनगर, जुन्नर, राजूरसह सहा ठिकाणी हिरडा खरेदीसाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या केंद्रांना आता ही दरनिश्चिती कळविण्यात येणार आहे.
‘हिरडा’साठी क्ंिवटलला अकराशेचा भाव निश्चित
By admin | Updated: June 20, 2014 01:19 IST