शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

हरिहर गडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:59 IST

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी झालेली चेंगराचेंगरी व एका महिलेचा पाय घसरून पडल्याने झालेला दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने पर्यटनस्थळे खुली करून अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिली आहे. पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच आहे.

ठळक मुद्देओव्हर कॉन्फीडेन्शनमुळे लोक जिवानिशी जातात.

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी झालेली चेंगराचेंगरी व एका महिलेचा पाय घसरून पडल्याने झालेला दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने पर्यटनस्थळे खुली करून अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिली आहे. पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच आहे.हरिहर किल्ला हा इतर किल्ल्यांच्या तुलनेत आगळावेगळा किल्ला असून, गडावर चढण्यासाठी करण्यात आलेल्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत. या अनोख्या पायऱ्यांसाठीही हा हर्षगड प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून उंची ११२० मीटर्स आहे. हा गड महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील हर्षवाडी गावाजवळ हा किल्ला आहे.हर्षगडाच्या परिसरातील गावे टाके हर्ष अस्वली हर्ष ही गावे आहेत. गडाच्या पायऱ्यांवर एकावेळी एकच माणूस चढू अगर उतरू शकतो. म्हणूनच हा गड चढण्यास अगर उतरण्यास धोकादायक आहे. काही महिन्यांपूर्वी गडावर पर्यटकांची गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची वेळ आली होती. त्यातच लॉकडाऊन लावल्याने पर्यटकांची गर्दी नको म्हणून पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली. तेथे वनरक्षक नियुक्त करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता पर्यटकांना जरी मोकळीक असली तरी सध्या संभाव्य कोरोनाची दुसरी लाट येऊ पाहते आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शिवाय सेल्फी काढणे वगैरेचा सोस वाढतो आहे. ओव्हर कॉन्फीडेन्शनमुळे लोक जिवानिशी जातात. याच कारणामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे. नव्हे त्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

टॅग्स :Fortगडigatpuri-acइगतपुरी