शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न फक्त बंडाचे नेतृत्व करण्याचा

By श्याम बागुल | Updated: January 30, 2019 12:51 IST

गेली अठरा वर्षे कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झालेले राजाराम पानगव्हाणे यांच्या काळात कॉँग्रेस केंद्रात व राज्यात सत्तेत होती, सत्तेचा लाभ जसा पानगव्हाणे यांना झाला तसाच तो जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनाही कमी, अधिक प्रमाणात झाला. परंतू ज्यावेळी सत्ता हातून गेली

ठळक मुद्देउरबडव्यांचे नेतृत्व कोणी करायचे यात एकमत होत नसल्याने शेवाळे यांच्या विरोधातील बंड तुर्त थंड शेवाळे यांच्या नियुक्तीच्या निर्णयातही राहूल गांधी यांचाच आदेश

श्याम बागुलनाशिक : निवड वा नियुक्ती कोणतीही असो त्यात वाद ठरलेले असतात, त्यातही जर राजकीय पक्षातील असेल तर विचारायला नको. अपवाद अखिल भारतीय कॉँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झालेल्या प्रियंका गांधीचा मानावा लागेल, परंतु त्यांची नियुक्ती जशी स्वकीयांना सुखावून गेली तशी त्यामुळे विरोधकांच्या पोटात भितीचा गोळाही उठवून गेली. नाशिक जिल्हा कॉँग्रेसच्या बाबतीत असेच काहीसे घडले. राजाराम पानगव्हाणे जिल्हाध्यक्ष नको म्हणून समस्त कॉँग्रेसजन एकमताने एकत्र आले परंतु त्यांच्या जागी कोण यावरून त्यांच्याच विसंवाद सुरू झाले, अशातच पक्षाने मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती केल्यामुळे त्याचा अनेकांना धक्का बसला. पानगव्हाणे नको इतपर्यंत ठीक परंतु तुषार शेवाळे यांची नेमणूक करताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगून विरोधकांनी उर बडवायला सुरूवात केली. मात्र या उरबडव्यांचे नेतृत्व कोणी करायचे यात एकमत होत नसल्याने शेवाळे यांच्या विरोधातील बंड तुर्त थंड झाले आहे.

गेली अठरा वर्षे कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झालेले राजाराम पानगव्हाणे यांच्या काळात कॉँग्रेस केंद्रात व राज्यात सत्तेत होती, सत्तेचा लाभ जसा पानगव्हाणे यांना झाला तसाच तो जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनाही कमी, अधिक प्रमाणात झाला. परंतू ज्यावेळी सत्ता हातून गेली त्यावेळी पानगव्हाणे यांना जिल्हाध्यक्षपद पेलने अवघड झाले, त्याच बरोबर अन्य पदाधिका-यांनाही पानगव्हाणे नकोसे झाले. सत्तेचा मलिदा कमी होताच, पक्षाकडे व संघटनेकडे दुर्लक्ष झाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कॉँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्याचे सारे खापर पानगव्हाणे यांच्यावर फोडून स्थानिक पदाधिकारी जसे नामनिराळे झाले, तसेच आजी-माजी आमदारांनीही आपली जबाबदारी झटकली. जिल्हा कार्यकारिणीतील नेमणूका असो वा तालुक्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती देताना पानगव्हाणे यांच्याकडून झालेला मानापमानाच्या गोेष्टींची जाहीर चर्चा घडवून आणण्यात आली. यासह अनेक कारणांनी पानगव्हाणे यांना पदावरून काढून टाकण्यासाठी एकवटलेल्या जिल्ह्यातील कॉँग्रेस पदाधिकाºयांना नवीन फेरबदलामुळे यश मिळाले असले तरी, तुषार शेवाळे यांच्या नियुक्तीने दु:खही तितकेच झाले आहे. पानगव्हाणे नको म्हणतांना एकत्र आलेल्या विरोधकांमध्ये पानगव्हाणे यांच्या उत्तराधिका-याबाबत एकमत होत नसल्यानेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या शेवाळे यांना पक्षश्रेष्ठींनी पसंती दिली. उच्चशिक्षीत, पक्षाशी एकनिष्ठ, संघटन कौशल्य अशी अंगी गुण बाळगणा-या शेवाळे यांची नियुक्तीही पानगव्हाणे विरोधकांना खटकली व त्यासाठी नेहमीप्रमाणे जमवाजमवही करण्यात आली. यात मालेगावच्याच काही कॉँग्रेसजनांनी पुढाकार घेतला व त्याला विद्यमान आमदाराने फूस दिल्याची चर्चा घडवून आणली. असंतृष्ठांच्या बैठकीचे नियोजनही करण्यात आले. जिल्हाध्यक्षपदाचा भार स्विकारण्यापुर्वीच सुरू झालेल्या पदाधिका-यांच्या सुंदोपसुंदीमुळे तुषार शेवाळे यांचा पदभाराचा कार्यक्रमही लांबणीवर टाकण्यात आला. परंतु ज्या प्रमाणे प्रियंका गांधी यांच्या सरचिटणीसपदाचा निर्णय पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी घेतला, तसाच शेवाळे यांच्या नियुक्तीच्या निर्णयातही राहूल गांधी यांचाच आदेश असल्याचा पक्ष श्रेष्ठींचा निरोप येताच बंडखोरांना आपल्या गंजलेल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या. आता शेवाळे हटावसाठी नवीन संधीचा शोध घेतला जाईल, प्रश्न या बंडखोरांचे नेतृत्व कोण करणार याचाच राहील.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस