शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पाणवेलींपासून बनणार आता पर्स, पडदा, परडी, फुलदाणी!

By suyog.joshi | Updated: December 29, 2023 19:23 IST

गोदा पाणवेलीमुक्त होण्यास हातभार लागणार आहे.

नाशिक  : महापालिकेकडून पाणवेली हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, मात्र पाणवेली काही हटता हटत नसल्याचे दिसून येत आहे. तपोवन भागातील सरस्वती पुलाच्या खाली गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पाणवेलींनी आच्छादिले आहे. त्या पाश्व'भूमीवर नाशिक महापालिका गोदावरी संवर्धन विभागाचे पर्यावरण संवर्धनासाठी पुढे पावले टाकत असून, शहर हद्दीतील नदीपात्रातील पाणवेली मनपाच्या बचतगटांना देणार आहे. त्यामुळे गोदा पाणवेलीमुक्त होण्यास हातभार लागणार आहे.

चांदोरी, सायखेडा येथे गोदावरीवर पाणवेलींचा थर मोठ्या प्रमाणात साचतो. ग्रामस्थांच्या मदतीने गोदावरीला पाणवेलींपासून मुक्त केले जाते. मात्र, या पाणवेलींची विल्हेवाट लावणे डोकेदुखी ठरत होती. त्यावर पर्याय म्हणून नीफ जीवन या सेवाभावी संस्थेची मदत घेण्यात आली. पाणवेलींपासून जीवनोपयोगी वस्तू तयार करण्यासाठी आसामहून दोन प्रशिक्षकही बोलविण्यात आले. या प्रशिक्षकांमार्फत बचतगटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी या पाणवेलींपासून चहाच्या कपाखालील कोस्टर बनविले, तसेच पाणवेलींपासून सात ते आठ विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यात आल्या. या वस्तू बनविण्याचे मशीनही सेवाभावी संस्थेने या महिला बचतगटाला पुरविले आहे. या वस्तूंचे ऑनलाइन मार्केटिंग सेवाभावी संस्थेकडून करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर गोदावरी संवर्धन विभाग गोदापात्रातील पाणवेली मनपाच्या बचतगटांना उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांना वस्तू बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.-या वस्तू होणार तयारलेडिज पर्स, कोस्टर, फुलदाणी, देवघरातील आसन, परडी, आकर्षक पिशव्या, आकर्षक पडदे-पाणवेलींमुळे प्रदूषण वाढते. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जिल्हा परिषदेच्या धर्तीवर महापालिका गोदेतील पाणवेली बचतगटांना देतील. त्यापासून जीवनाश्यक रोजच्या वापरातील वस्तू तयार केल्या जातील. त्यामुळे पाणवेली विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लागेल. मनपातर्फे प्रयत्न सुरू आहेत.- विजयकुमार मुंडे, उपायुक्त, पर्यावरण विभाग मनपा

टॅग्स :Nashikनाशिक