शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

महिला बचत गटाच्या माध्यमातून बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 00:41 IST

जळगाव नेऊर : सध्या अनेक भागात वरुणराजा बरसत आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला भांडवलाची चिंता भेडसावत असते, यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद महिला उमेद स्वयंसहायता समुहातील महिलांनी बचत केलेल्या रक्कमेतुन शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करून बचतीचा सदुपयोग केला आहे.

ठळक मुद्देएरंडगावच्या स्वामी विवेकानंद महिला बचत गटाचा उपक्रम

जळगाव नेऊर : सध्या अनेक भागात वरुणराजा बरसत आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला भांडवलाची चिंता भेडसावत असते, यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद महिला उमेद स्वयंसहायता समुहातील महिलांनी बचत केलेल्या रक्कमेतुन शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करून बचतीचा सदुपयोग केला आहे.एरंडगाव, जळगाव नेऊर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली असुन शेतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. तसेच या भागात पेरणीची लगबग सुरु झाली असुन, बऱ्याच शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीसाठी पर्याप्त पैसा उपलब्ध नसतो, अशावेळी उधार, उसनवार, अथवा बँका, पतसंस्था यांच्याकडे सोनेतारण कर्ज घेऊन पैशाची गरज भागविली जाते. ही बाब लक्षात घेऊन या गटातील महिलांनी वर्षभर बचत करून गटातील प्रत्येक महिला सदस्याला बियाणे खरेदीसाठी रक्कम देऊन शेतीला हातभार लावला आहे.वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या गटाने या अगोदरही बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य सदुपयोग केला आहे.या उपक्रमामुळे बचत गटाचे अध्यक्ष मंगला खकाळे, सचिव सुवर्णा पडोळ, सदस्य शिला शिंदे, सुवर्णा वसंत पडोळ, मंदा शिंदे, ज्योती खकाळे, छाया शिंदे, मंगला शिंदे, सुमन पडोळ, कविता रंधे, सुनीता पडोळ, अलका शिंदे या महिलांचे परिसरात कौतुक होत आहे.समुहातील महिलांचे सक्षमीकरण होत असुन बचतीच्या रक्कमेचा योग्य वेळी वापर होत आहे. तसेच गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसुन येत आहे.- सुवर्णा पडोळ, सचिव, स्वामी विवेकानंद महिला बचत गट. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती