शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महिला बचत गटाच्या माध्यमातून बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 00:41 IST

जळगाव नेऊर : सध्या अनेक भागात वरुणराजा बरसत आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला भांडवलाची चिंता भेडसावत असते, यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद महिला उमेद स्वयंसहायता समुहातील महिलांनी बचत केलेल्या रक्कमेतुन शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करून बचतीचा सदुपयोग केला आहे.

ठळक मुद्देएरंडगावच्या स्वामी विवेकानंद महिला बचत गटाचा उपक्रम

जळगाव नेऊर : सध्या अनेक भागात वरुणराजा बरसत आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला भांडवलाची चिंता भेडसावत असते, यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद महिला उमेद स्वयंसहायता समुहातील महिलांनी बचत केलेल्या रक्कमेतुन शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करून बचतीचा सदुपयोग केला आहे.एरंडगाव, जळगाव नेऊर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली असुन शेतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. तसेच या भागात पेरणीची लगबग सुरु झाली असुन, बऱ्याच शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीसाठी पर्याप्त पैसा उपलब्ध नसतो, अशावेळी उधार, उसनवार, अथवा बँका, पतसंस्था यांच्याकडे सोनेतारण कर्ज घेऊन पैशाची गरज भागविली जाते. ही बाब लक्षात घेऊन या गटातील महिलांनी वर्षभर बचत करून गटातील प्रत्येक महिला सदस्याला बियाणे खरेदीसाठी रक्कम देऊन शेतीला हातभार लावला आहे.वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या गटाने या अगोदरही बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य सदुपयोग केला आहे.या उपक्रमामुळे बचत गटाचे अध्यक्ष मंगला खकाळे, सचिव सुवर्णा पडोळ, सदस्य शिला शिंदे, सुवर्णा वसंत पडोळ, मंदा शिंदे, ज्योती खकाळे, छाया शिंदे, मंगला शिंदे, सुमन पडोळ, कविता रंधे, सुनीता पडोळ, अलका शिंदे या महिलांचे परिसरात कौतुक होत आहे.समुहातील महिलांचे सक्षमीकरण होत असुन बचतीच्या रक्कमेचा योग्य वेळी वापर होत आहे. तसेच गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसुन येत आहे.- सुवर्णा पडोळ, सचिव, स्वामी विवेकानंद महिला बचत गट. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती