शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

महिला बचत गटाच्या माध्यमातून बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 00:41 IST

जळगाव नेऊर : सध्या अनेक भागात वरुणराजा बरसत आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला भांडवलाची चिंता भेडसावत असते, यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद महिला उमेद स्वयंसहायता समुहातील महिलांनी बचत केलेल्या रक्कमेतुन शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करून बचतीचा सदुपयोग केला आहे.

ठळक मुद्देएरंडगावच्या स्वामी विवेकानंद महिला बचत गटाचा उपक्रम

जळगाव नेऊर : सध्या अनेक भागात वरुणराजा बरसत आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला भांडवलाची चिंता भेडसावत असते, यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद महिला उमेद स्वयंसहायता समुहातील महिलांनी बचत केलेल्या रक्कमेतुन शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करून बचतीचा सदुपयोग केला आहे.एरंडगाव, जळगाव नेऊर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली असुन शेतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. तसेच या भागात पेरणीची लगबग सुरु झाली असुन, बऱ्याच शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीसाठी पर्याप्त पैसा उपलब्ध नसतो, अशावेळी उधार, उसनवार, अथवा बँका, पतसंस्था यांच्याकडे सोनेतारण कर्ज घेऊन पैशाची गरज भागविली जाते. ही बाब लक्षात घेऊन या गटातील महिलांनी वर्षभर बचत करून गटातील प्रत्येक महिला सदस्याला बियाणे खरेदीसाठी रक्कम देऊन शेतीला हातभार लावला आहे.वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या गटाने या अगोदरही बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य सदुपयोग केला आहे.या उपक्रमामुळे बचत गटाचे अध्यक्ष मंगला खकाळे, सचिव सुवर्णा पडोळ, सदस्य शिला शिंदे, सुवर्णा वसंत पडोळ, मंदा शिंदे, ज्योती खकाळे, छाया शिंदे, मंगला शिंदे, सुमन पडोळ, कविता रंधे, सुनीता पडोळ, अलका शिंदे या महिलांचे परिसरात कौतुक होत आहे.समुहातील महिलांचे सक्षमीकरण होत असुन बचतीच्या रक्कमेचा योग्य वेळी वापर होत आहे. तसेच गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसुन येत आहे.- सुवर्णा पडोळ, सचिव, स्वामी विवेकानंद महिला बचत गट. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती