शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

इगतपुरीत १०२ विनामास्क कामगारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:12 IST

 चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागाने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णात वाढ झाल्याची बाब समोर  आली आहे.  दरम्यान गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अकस्मात एका कंपनीस  भेट देऊन विनामास्क वावरणाऱ्या १०२  कामगारांवर प्रत्येकी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. 

ठळक मुद्देवाढत्या रुग्णसंख्येने नागरिकांत चिंता

घोटी :  चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागाने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णात वाढ झाल्याची बाब समोर  आली आहे.  दरम्यान गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अकस्मात एका कंपनीस  भेट देऊन विनामास्क वावरणाऱ्या १०२  कामगारांवर प्रत्येकी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली असून कोरोना रोखण्यासाठी घालण्यात येणाऱ्या बंधनांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात आठवडे बाजार, तसेच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवशीही जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने वगळता अन्य दुकाने , व्यवहार व आस्थापने बंद राहत असल्याने मजुरी, रोजगार आदींचा प्रश्न निर्माण होत आहे. चार दिवसांपासून तालुक्यात अचानक रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातही सर्वच गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुरु झाल्या आहेत. घोटी, इगतपुरी, कांचनगाव, टाकेद आदी ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.तालुका आरोग्य प्रशासनाने गेल्या आठवडाभरात जवळपास एक हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ८१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असून काही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.वीस हजारांचा दंड वसूलगटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, भरत वेंदे, घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.१८) तालुक्यातील जिंदाल कंपनीत जाऊन नियमांच्या अंमलबजावणीची तपासणी केली असता अनेक कामगार विनामास्क वावरत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. या बाबीची दखल घेत १०२ कामगारांना प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे वीस हजार चारशे रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पळे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस