शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

इगतपुरीत १०२ विनामास्क कामगारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:12 IST

 चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागाने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णात वाढ झाल्याची बाब समोर  आली आहे.  दरम्यान गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अकस्मात एका कंपनीस  भेट देऊन विनामास्क वावरणाऱ्या १०२  कामगारांवर प्रत्येकी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. 

ठळक मुद्देवाढत्या रुग्णसंख्येने नागरिकांत चिंता

घोटी :  चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागाने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णात वाढ झाल्याची बाब समोर  आली आहे.  दरम्यान गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अकस्मात एका कंपनीस  भेट देऊन विनामास्क वावरणाऱ्या १०२  कामगारांवर प्रत्येकी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली असून कोरोना रोखण्यासाठी घालण्यात येणाऱ्या बंधनांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात आठवडे बाजार, तसेच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवशीही जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने वगळता अन्य दुकाने , व्यवहार व आस्थापने बंद राहत असल्याने मजुरी, रोजगार आदींचा प्रश्न निर्माण होत आहे. चार दिवसांपासून तालुक्यात अचानक रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातही सर्वच गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुरु झाल्या आहेत. घोटी, इगतपुरी, कांचनगाव, टाकेद आदी ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.तालुका आरोग्य प्रशासनाने गेल्या आठवडाभरात जवळपास एक हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ८१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असून काही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.वीस हजारांचा दंड वसूलगटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, भरत वेंदे, घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.१८) तालुक्यातील जिंदाल कंपनीत जाऊन नियमांच्या अंमलबजावणीची तपासणी केली असता अनेक कामगार विनामास्क वावरत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. या बाबीची दखल घेत १०२ कामगारांना प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे वीस हजार चारशे रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पळे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस