शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहपत्रिकांबाबत सामाजिक संघटना करणार जनजागृती़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:16 IST

विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ या प्रश्नाची सुशिक्षित नागरिक, लॉन्स व मंगल कार्यालयचालक यांच्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली आहे़

नाशिक : विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ या प्रश्नाची सुशिक्षित नागरिक, लॉन्स व मंगल कार्यालयचालक यांच्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली आहे़या संघटनांच्या अध्यक्षांनी जनमानसातील जनजागृतीसाठी पुढाकार घेणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत़  विवाहपत्रिका वाटपाबाबत ‘लोकमत’ने ७ मेपासून जनजागृती अभियान सुरू केले़ या अभियानास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर लोकमतमध्ये प्रकाशित झालेली ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ ही बातमी पाठविली गेली़  लोकमतच्या या अभियानास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, पुढील वर्षीपासून पत्रिका वाटप बंद असा संकल्पही केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत़ लग्नपत्रिका वाटणे हे कष्टदायक काम़ चुकून एखाद्या नातेवाईकास किंवा मित्रास पत्रिका द्यायची राहून गेल्यास रुसवा-फुगवा आणि नाराजी ओढवून घ्यावी लागते. ज्याच्या घरी लग्न आहे त्याला मदत करण्यापेक्षा पत्रिका मिळाली नाही म्हणून जाहीर नाराजी व्यक्त करतात़ या कालावधीतील अपघात पाहता लग्नपत्रिका घरपोच मिळालीच पाहिजे ही मानसिकता बदलली पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दूरध्वनीचा वापर करण्यासाठी जनजागृती करणार आहोत़- बाळासाहेब पोरजे, माजी अध्यक्ष, न्यू गोदावरी ज्युनिअर चेंबर, सातपूरमाहिती तंत्रज्ञानातातील क्रांतीबरोबरच सामाजिक क्रांतीही गरजेची आहे. विवाहाच्या आमंत्रणपत्रिका घरोघरी वाटत बसण्यापेक्षा सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून निमंत्रण देणे काळाची गरज झाली आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने हे काम तर अधिकच सोपे झाले आहे़ त्यामुळे नातेवाइकांनीही आपला समंजसपणा दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़ याबाबत प्रवर्तक संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे़- बजरंग शिंदे, अध्यक्ष, प्रवर्तक सामाजिक विकास संस्था, नाशिकसध्याच्या धावपळीच्या युगात गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वाटप करणे वेळेअभावी शक्य नाही. त्यामुळे काळानुसार आपण बदलले पाहिजे. लग्नपत्रिका घरपोहोच मिळाली तरच लग्नाला जाऊ ही मानसिकता बदलून नवीन साधनांची मदत घेण्याचा सल्ला द्यायला हवा़ सोशल मीडियाचा वापर करून अथवा दूरध्वनीद्वारे आमंत्रण देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेणार आहे़ - बाळासाहेब जाधव  , अध्यक्ष, जनविकास फाउंडेशन, सातपूर

टॅग्स :social workerसमाजसेवक