शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

खरीप, रब्बीसाठी अनुदान द्यावे

By admin | Updated: July 28, 2014 00:42 IST

दुष्काळी स्थिती : सायाळे येथील शेतकऱ्यांची मागणी

सिन्नर : शासनाने दुष्काळी शेतकऱ्यांसाठी दिलेले नुकसानभरपाईचे अनुदान अद्याप मिळाले नाही. खरीप व रब्बी हंगामाचे निवेदन त्वरित देण्याची मागणी सायाळे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सन २०१२ - १३ या वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील अनुदान अद्याप प्राप्त झाले नाहीत. याबाबत येथील शेतकरी रोज तलाठी कार्यालयात चकरा मारुन कंटाळले आहेत. पाथरे येथील नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतही शेतकरी चकरा मारतात. मात्र अद्याप अनुदान प्राप्त झाले नसल्याचे तेथील अधिकारी सांगत आहेत. तालुक्याच्या पूर्वभागात सलग चौथ्या वर्षीही पाऊस झाला नसल्याने दुष्काळी स्थिती आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतीतील नऊ हंगाम पावसाअभावी वाया गेले आहे. त्याच उन्हाळ््यात गारपीट व वादळी पावसाने उभ्या असलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी रब्बी हंगामात जोरदार वादळी व अवकाळी पावसाने गहू, हरभरा व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाच्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र त्याच्या भरपाईचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे. शासनाकडे अनेकदा मागणी करूनही शासनाकडून अद्याप अनुदानाबाबत काहीही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनावर रतन गोरे, विजय शिंदे, मच्छिंद्र गोरे, सुशीला गोरे, रामभाऊ गवारे, गणपत शिंदे, सुंदराबाई शिंदे, योगेश शेळके, दादा बुरकुले, देवराम शेळके, भाऊसाहेब शेळके, योगेश शेळके आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)