शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

खरीप, रब्बीसाठी अनुदान द्यावे

By admin | Updated: July 28, 2014 00:42 IST

दुष्काळी स्थिती : सायाळे येथील शेतकऱ्यांची मागणी

सिन्नर : शासनाने दुष्काळी शेतकऱ्यांसाठी दिलेले नुकसानभरपाईचे अनुदान अद्याप मिळाले नाही. खरीप व रब्बी हंगामाचे निवेदन त्वरित देण्याची मागणी सायाळे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सन २०१२ - १३ या वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील अनुदान अद्याप प्राप्त झाले नाहीत. याबाबत येथील शेतकरी रोज तलाठी कार्यालयात चकरा मारुन कंटाळले आहेत. पाथरे येथील नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतही शेतकरी चकरा मारतात. मात्र अद्याप अनुदान प्राप्त झाले नसल्याचे तेथील अधिकारी सांगत आहेत. तालुक्याच्या पूर्वभागात सलग चौथ्या वर्षीही पाऊस झाला नसल्याने दुष्काळी स्थिती आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतीतील नऊ हंगाम पावसाअभावी वाया गेले आहे. त्याच उन्हाळ््यात गारपीट व वादळी पावसाने उभ्या असलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी रब्बी हंगामात जोरदार वादळी व अवकाळी पावसाने गहू, हरभरा व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाच्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र त्याच्या भरपाईचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे. शासनाकडे अनेकदा मागणी करूनही शासनाकडून अद्याप अनुदानाबाबत काहीही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनावर रतन गोरे, विजय शिंदे, मच्छिंद्र गोरे, सुशीला गोरे, रामभाऊ गवारे, गणपत शिंदे, सुंदराबाई शिंदे, योगेश शेळके, दादा बुरकुले, देवराम शेळके, भाऊसाहेब शेळके, योगेश शेळके आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)