शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

किसान सभेच्या वतीने जिल्ह्यात केंद्राच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:24 IST

शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलनाची दखल घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

ठळक मुद्देनिषेधाच्या घोषणा : जिल्ह्यात ठिकठिकाणी लावले काळे झेंडे

नाशिक : शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलनाची दखल घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करीत असून, ठाण मांडून बसलेले आहेत. त्यास सहा महिने पूर्ण होत असून शेतकरीविरोधी तीन जुलमी कायदे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.  शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, लेबर कोड कायदा रद्द करावा, मोफत लस आणि उपचार देण्यात यावा, चार महिने मोफत धान्य देण्यात यावे, बेरोजगारांना ६००० रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रद्द करण्यात यावा, राज्य सरकारांना जीएसटीचे पैसे देण्यात यावेत, वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचारी घोषित करावे, रोजगार हमी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रतिदिन देण्यात यावेत, रिक्त पदे भरण्यात यावीत, ईपीएफ पेन्शनर्सला किमान नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी किसान सभेचे राज्य सचिव, आायटकचे  जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, संघटक विजय दराडे,  सुखदेव केदारे,  दत्तात्रय गांगुर्डे, अरुण म्हस्के, सखाराम दुर्गुडे, उज्ज्वल गांगुर्डे  यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. सुनीता कुलकर्णी, किरण डावखर, मकसूद अन्सारी, मीना आढाव, देवीदास भोपाळे, सुभाष काकड, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश नाईक, नरेंद्र कांबळे, चित्रा जगताप, हसीना शेख आदी सहभागी झाले होते.केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेधकेंद्र सरकारलादेखील सात वर्षं पूर्ण होत असून, गेल्या सात वर्षांच्या कालावधीत केंद्राने शेतकरी, कामगार, कर्मचारीविरोधी धोरण अवलंबिले असून  शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ निषेध दिन पाळण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातात काळे झेंडे फडकावत निषेध नोंदविला. अनेकांनी आपल्या घरांवर तसेच वाहनांवरही काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा विरोध दर्शविला. 

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन