शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

नव्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:27 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. अव्वल कारकून संतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देनांदगाव : कॉँग्रेसतर्फे तहसील प्रशासनास निवेदन

नांदगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. अव्वल कारकून संतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारले.रविवारी (दि. २०) शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, शेतकरी मूल्य आश्वासन आणि कृषिसेवा विधेयक भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले आहे. या विधेयकामुळे देशी-विदेशी कंपन्या शेती व्यवसायात उतरतील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येऊन हजारो लोक बेरोजगार होतील. साठेबाजारावर अंकुश राहणार नाही. शेतमालाच्या किमती अस्थिर होतील. अन्नधान्यावरील स्वावलंबन संपून कंपन्यांच्या हातात निर्णय जातील. शेतकºयाला बाहेर कुठेही शेतमाल विकल्यास मिळणारे मूल्य हे किमान आधारभूत मूल्यापेक्षा कमी नसावे, अशी तरतूद विधेयकात नाही व ठेकेदारी तत्त्वावर शेती केल्यावर त्यात जर कुठला वाद निर्माण झाला तर तो दिवाणी न्यायालयाच्या कक्षेबाहेर राहील. अत्यावश्यक वस्तू कायद्यातील दुरु स्तीमुळे व्यापारीवर्ग गरजेपेक्षाही जास्त प्रमाणात मालाचा साठा करू शकतात त्यासाठी त्यांना कुठल्याही शिक्षेची तरतूद नाही यायावेळी दर्शन आहेर, कैलास गायकवाड, उदय पाटील, पुंडलिक सदगीर, जितेंद्र देशमुख, शब्बीर शेख, योगेश वाघ, किरण जाधव, रोशन आहेर, किशोर वाघ, नारायण सदगीर, एकनाथ बोराडे, निरंजन आहेर, सागर जाधव, अक्षय कासलीवाल, प्रवीण घोटेकर, ज्ञानेश्वर अहिरे, सागर साळुंके आदी उपस्थित होते. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे, शहर प्रमुख सोनू पेवाल यांनी आंदोलनात सहभाग नोंदवूनपाठिंबा दर्शविला.विधेयक रद्दची मागणीसाठेबाजीमुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ पोहोचेल तसेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांची इतकी काळजी आहे तर त्यांनी किमान आधारभूत किंमत किवा हमीभाव यापेक्षा कमी दराने कृषीमाल खरेदी करणे गुन्हा का ठरवत नाही. हे विधेयक म्हणजे शेतकºयांचे मृत्यूचे फर्मान आहे हे रद्द न झाल्यास नांदगाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणcongressकाँग्रेसagitationआंदोलन