शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:27 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. अव्वल कारकून संतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देनांदगाव : कॉँग्रेसतर्फे तहसील प्रशासनास निवेदन

नांदगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. अव्वल कारकून संतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारले.रविवारी (दि. २०) शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, शेतकरी मूल्य आश्वासन आणि कृषिसेवा विधेयक भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले आहे. या विधेयकामुळे देशी-विदेशी कंपन्या शेती व्यवसायात उतरतील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येऊन हजारो लोक बेरोजगार होतील. साठेबाजारावर अंकुश राहणार नाही. शेतमालाच्या किमती अस्थिर होतील. अन्नधान्यावरील स्वावलंबन संपून कंपन्यांच्या हातात निर्णय जातील. शेतकºयाला बाहेर कुठेही शेतमाल विकल्यास मिळणारे मूल्य हे किमान आधारभूत मूल्यापेक्षा कमी नसावे, अशी तरतूद विधेयकात नाही व ठेकेदारी तत्त्वावर शेती केल्यावर त्यात जर कुठला वाद निर्माण झाला तर तो दिवाणी न्यायालयाच्या कक्षेबाहेर राहील. अत्यावश्यक वस्तू कायद्यातील दुरु स्तीमुळे व्यापारीवर्ग गरजेपेक्षाही जास्त प्रमाणात मालाचा साठा करू शकतात त्यासाठी त्यांना कुठल्याही शिक्षेची तरतूद नाही यायावेळी दर्शन आहेर, कैलास गायकवाड, उदय पाटील, पुंडलिक सदगीर, जितेंद्र देशमुख, शब्बीर शेख, योगेश वाघ, किरण जाधव, रोशन आहेर, किशोर वाघ, नारायण सदगीर, एकनाथ बोराडे, निरंजन आहेर, सागर जाधव, अक्षय कासलीवाल, प्रवीण घोटेकर, ज्ञानेश्वर अहिरे, सागर साळुंके आदी उपस्थित होते. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे, शहर प्रमुख सोनू पेवाल यांनी आंदोलनात सहभाग नोंदवूनपाठिंबा दर्शविला.विधेयक रद्दची मागणीसाठेबाजीमुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ पोहोचेल तसेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांची इतकी काळजी आहे तर त्यांनी किमान आधारभूत किंमत किवा हमीभाव यापेक्षा कमी दराने कृषीमाल खरेदी करणे गुन्हा का ठरवत नाही. हे विधेयक म्हणजे शेतकºयांचे मृत्यूचे फर्मान आहे हे रद्द न झाल्यास नांदगाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणcongressकाँग्रेसagitationआंदोलन