शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

शेतकरी संघटनेचा पाणी सोडण्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:41 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याअभावी जळून गेली असून, अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाला पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याअभावी जळून गेली असून, अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाला पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी दहा तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत. त्यामुळे खरिपातील पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी. नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा. जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणीसाठा असून, तो पुरेसा आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सिन्नर, नांदगाव, चांदवड, येवला या तालुक्यांमध्ये आत्ताच टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. काही दिवसांत निफाड, नाशिक, दिंडोरी या तालुक्यांमध्येदेखील भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडीला सोडणे योग्य होणार नाही. गंगापूर डाव्या कालव्यावर लाखो रुपये कर्ज काढून द्राक्ष, डाळींब व इतर फळबागा शेतकºयांनी उभ्या केल्या आहेत.अत्यल्प पावसामुळे आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवत असून, रब्बीचे पहिले रोटेशन १५ डिसेंबरला सोडण्यात यावे, शेतकरी कर्जबाजारी झाल्याने त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती लागू करावी, शेतीला बारा तास थ्री फेज लाइट द्यावी, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी अर्जुन बोराडे, रामनाथ ढिकले, भीमराव बोराडे, रामकृष्ण बोंबले, भगवान बोराडे, सोपान कडलग आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी