शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

अल्पसंख्याकांना संरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:55 PM

नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे.

नाशिक : देशातील विविध भागांत गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत असल्याने अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांवर मोकोको कायद्याअंतर्गत कारवाई करून अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी मालेगावचे आमदार तथा इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी केली आहे.  आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वात इन्सानियत बचाव, लोकशाही बचाव संघर्ष समितीने मालेगाव ते नाशिक पदयात्रा काढून देशभरातील अल्पसंख्याकांवर होणाºया हल्ल्यांचा निषेध नोंदवला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून हाफिज जुनैद याची रेल्वेमध्ये हत्या झाल्याने अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.मालेगाव येथील शहीद चौैकातून १५ आॅगस्ट रोजी काढलेली पदयात्रा सुमारे ११० कि लोमीटर अंतर चालून शनिवारी (दि.१९) नाशिक येथील हुतात्मा स्मारकात पोहोचली. या भगवान आढाव, लतिफ बागवान, विठ्ठल बर्वे, अब्दुल कय्यम, शहजाद अख्तर, अब्दुल सिद्दीकी यांच्यासह नाशिकमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, पंडित येलमामे, दगडूशा कलाल, सरस्वती पाटील, सरस्वती मोरे, विमल अचावणे यांनीही सहभाग घेतला. तसेच काँगेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, बबलू खैरे यांच्यासह छात्रभारतीचे सागर निकम, समाधान बागुल, मंगेश साबळे आदींनीही या पदयात्रेत सहभाग घेतला.प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लीम व दलित समुदायांवर हल्ले करून काही पक्ष व जातीयवादी संघटना एकधर्मी राष्ट्र निर्माण करू पाहत आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी संसदेत व विधिमंडळात कडक कायदा अस्तित्वात आणण्याच्या मागणीसह अशा संघटनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणीही यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या आंदोलकांनी केली. आंदोलकांचा ठिय्याच्मालेगाव येथून पदयात्रेने नाशिकपर्यंत आलेल्या इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचा आग्रह केला. परंतु, जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मध्यस्थी करून निवेदन स्वीकारून तिढा सोडवला.