शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी वनसंरक्षकांना घेराव ; मासेमारी थांबविण्याची नेचर क्लबची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:15 IST

नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने येथील मासेमारी थांबविण्यात यावी तसेच अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी (दि.१२) मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देनांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मासेमारीजगभरातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणीअभयारण्य वाचवण्यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिकचा वनसंरक्षकांना घेराव

नाशिक : नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने येथील मासेमारी थांबविण्यात यावी तसेच अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी (दि.१२) मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. नेचर क्लब ऑफ  नाशिकतर्फे नांदूरमधमेश्वर येथील मासेमारी थांबविण्यासोबतच, कार्यालय स्थलांतराच्या मागणीसह जखमी पक्ष्यांना अभयारण्यात उपचार मिळण्यासाठी उपचार केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पक्षी संरक्षण समिती स्थापन करावी, गाइड काम करणाऱ्या तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, पर्यटकांना विविध सुविधा मिळव्यात, तसेत अधिकाºयांना राजकीय नेत्यांच्या दबावातून मुक्त करण्यात यावे आदी मागण्यांसाठी संस्थेतर्फे वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, डॉ. विक्रांत जाधव, प्रमिला पाटील, सीमा पाटील, भारती जाधव, किरण बेलेकर, योगेश कापसे, अमोल दराडे, प्रमोद फाल्गुने, सर्पमित्र मनीष गोडबोले, प्रमोद महानुभाव, गिरीश ताजने, लक्ष्मीकांत कोतकर, रोहित नाईक, भाऊसाहेब राजोळे, सागर बनकर आदींसह शहरातील वन्यजीव व पक्षिमित्र घेराव आंदोलनात सहभागी झाले होते.  

पक्ष्यांच्या मुखवट्यांसह आंदोलननाशिकमधील सर्व पक्षिमित्र, प्राणिमित्र, सर्पमित्र, वृक्षमित्र, पर्यावरणावर कार्य करणाऱ्या संस्था एकत्रित येऊन कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने मुख्य वनसंरक्षक नाशिक यांना घेराव घालून मृत पक्ष्यांसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कार्यवाई करण्याची मागणी केली. यावेळी  निसर्ग मित्रांनी पक्ष्यांचे मुखवटे परिधान केले होते. दरम्यान, वनाधिकाऱ्यानी पक्ष्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कार्यवाही होणार असल्याचे सांगत पक्षी संवर्धन समिती स्थापन करण्याचेही आश्वासन दिले.   

टॅग्स :forestजंगलNashikनाशिकforest departmentवनविभागagitationआंदोलन