शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीसाठीचे प्रस्ताव केवळ सुरगाण्यातून शक्य

By धनंजय रिसोडकर | Updated: July 12, 2023 16:51 IST

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातून नवीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

नाशिक : सामान्य गावासाठी २ हजार लोकसंख्येहून अधिक तर आदिवासी क्षेत्रातील गावासाठी १ हजारहून अधिक लोकसंख्या ओलांडलेल्या गावांना नवीन ग्रामपंचायतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील केवळ सुरगाणा तालुक्यातूनच केवळ ४१ नवीन ग्रामपंचायतचे प्रस्ताव तयार केले जाऊ शकतात. मात्र, गतवर्षी डिसेंबर महिन्यातच संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असल्याने निवडणुकांनंतर किमान २ वर्षे नवीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव पाठवता येत नसल्याने त्या गावांनादेखील ग्रामपंचायतीच्या दर्जाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातून नवीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. किमान २ हजार लोकसंख्या, जवळच्या गावापासूनचे अंतर यासह विविध निकषांचा त्यात अंतर्भाव असतो. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवीन गावांच्या मागणीचे प्रस्तावदेखील पाठवावेत, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नवीन ग्रामपंचायतींसाठीची माहिती गोळा करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर केवळ सुरगाण्यातूनच तशा स्वरूपाचे प्रस्ताव पाठविणे शक्य असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून दिसून येते. 

सुरगाण्यातील ४१ गावांनी एक हजार लोकसंख्येचा निकष पूर्ण केला आहे. मात्र, तिथे गतवर्षीच निवडणुका झाल्या असल्याने येत्या २०२४ अखेरपर्यंत त्या ग्रामपंचायतींचे नवीन प्रस्ताव तांत्रिक बाबींमुळे पाठविता येणार नाहीत. दरम्यान राज्य शासनाच्या जूनच्या अधिसूचनेद्वारे महिन्याच्या प्रारंभीच गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे स्वतंत्र कार्यकारिणी, ग्रामपंचायत कार्यालय, पंधरावा वित्त आयोग व पेसा निधी स्वतंत्रपणे मिळणार आहे. सदर नवीन ग्रामपंचायत स्थापनेमध्ये वाघेरे गोधड्याचा पाडा यांच्या कार्यकारिणी, मत्ता व दायित्व तसेच इतर कामकाज याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमितही करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक