शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठ्यांच्या आरक्षणासाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:59 IST

यापुढे पावसाची शक्यता धूसर झाल्याने व यंदा तालुक्यात पावसाळ्यात धरणांनी तळ गाठल्याने प्रशासनाने आगामी भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची तयारी सुरू केली असून, उपलब्ध जलसाठे अधिकृतरीत्या आरक्षित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहेत. येवला येथे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या कार्यालयात याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नांदगाव तालुक्यातील उपलबध जलसाठे व त्यानुअषंगाने नियोजनाबाबतची बैठक झाली.

ठळक मुद्देआढावा बैठक : पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी उपाययोजना

नांदगाव : यापुढे पावसाची शक्यता धूसर झाल्याने व यंदा तालुक्यात पावसाळ्यात धरणांनी तळ गाठल्याने प्रशासनाने आगामी भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची तयारी सुरू केली असून, उपलब्ध जलसाठे अधिकृतरीत्या आरक्षित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहेत. येवला येथे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या कार्यालयात याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नांदगाव तालुक्यातील उपलबध जलसाठे व त्यानुअषंगाने नियोजनाबाबतची बैठक झाली.यावर महसूल विभाग व पोलीस यंत्रणा सतर्क झाल्यास पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणात सध्या सव्वादोनशे दशलक्ष घनफूट पाण्याचा जलसाठा उपलबध असून, त्यात नांदगाव शहरासाठी सत्तर दशलक्ष घनफूट, तर तालुक्यातील पिण्याच्या टँकरसाठी साठ दशलक्ष घनफूट व पोखरीसाठी एक दशलक्ष घनफूट असे एकूण एकशे एकतीस दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात येईल, नाग्यासाक्या धरणात तर पावसाचा एकही थेंब न पडल्याने गेल्या वर्षीच्या शिल्लक पाण्यापैकी सध्या ९४ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा पिण्यासाठी आरक्षित केला जाणार आहे.तालुक्यातील इतर लघुपाट बंधाºयापैकी सध्या कासारीमधील चांदेश्वरी व गुळमोडी या दोघा धरणातील पाण्यावर यंदा पहिल्यांदा आरक्षण पडले. त्यातील गुळमोडीमध्ये तीस, तर चांदेश्वरीमध्ये वीस दशलक्ष घनफूट असे आरक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, जून महिन्यात पाऊस पडत नसल्याचे गृहीत धरून येत्या वर्षाच्या जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी सदर आरक्षण झाल्याचे सांगण्यात आले.तालुक्यात माणिकपुंज, नाग्या-साक्या, चांदेश्वरी, गुळमोडी यासारखे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लहान-मोठे जलसाठे असून, त्यातले पाणी शेती व इतर कारणांसाठी उपसले गेले तर लातूरप्रमाणे येथे भीषण परिस्थिती उभी राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठे आरक्षित करण्याची प्रक्रि या अत्यंत गतिमान करण्याची गरज आहे. याशिवाय जलसंपदा विभाग व वीज वितरण कंपनी यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रि या नागरिकांमधून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी