शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जलसाठ्यांच्या आरक्षणासाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:59 IST

यापुढे पावसाची शक्यता धूसर झाल्याने व यंदा तालुक्यात पावसाळ्यात धरणांनी तळ गाठल्याने प्रशासनाने आगामी भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची तयारी सुरू केली असून, उपलब्ध जलसाठे अधिकृतरीत्या आरक्षित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहेत. येवला येथे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या कार्यालयात याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नांदगाव तालुक्यातील उपलबध जलसाठे व त्यानुअषंगाने नियोजनाबाबतची बैठक झाली.

ठळक मुद्देआढावा बैठक : पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी उपाययोजना

नांदगाव : यापुढे पावसाची शक्यता धूसर झाल्याने व यंदा तालुक्यात पावसाळ्यात धरणांनी तळ गाठल्याने प्रशासनाने आगामी भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची तयारी सुरू केली असून, उपलब्ध जलसाठे अधिकृतरीत्या आरक्षित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहेत. येवला येथे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या कार्यालयात याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नांदगाव तालुक्यातील उपलबध जलसाठे व त्यानुअषंगाने नियोजनाबाबतची बैठक झाली.यावर महसूल विभाग व पोलीस यंत्रणा सतर्क झाल्यास पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणात सध्या सव्वादोनशे दशलक्ष घनफूट पाण्याचा जलसाठा उपलबध असून, त्यात नांदगाव शहरासाठी सत्तर दशलक्ष घनफूट, तर तालुक्यातील पिण्याच्या टँकरसाठी साठ दशलक्ष घनफूट व पोखरीसाठी एक दशलक्ष घनफूट असे एकूण एकशे एकतीस दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात येईल, नाग्यासाक्या धरणात तर पावसाचा एकही थेंब न पडल्याने गेल्या वर्षीच्या शिल्लक पाण्यापैकी सध्या ९४ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा पिण्यासाठी आरक्षित केला जाणार आहे.तालुक्यातील इतर लघुपाट बंधाºयापैकी सध्या कासारीमधील चांदेश्वरी व गुळमोडी या दोघा धरणातील पाण्यावर यंदा पहिल्यांदा आरक्षण पडले. त्यातील गुळमोडीमध्ये तीस, तर चांदेश्वरीमध्ये वीस दशलक्ष घनफूट असे आरक्षण करण्यात आले आहे. दरम्यान, जून महिन्यात पाऊस पडत नसल्याचे गृहीत धरून येत्या वर्षाच्या जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी सदर आरक्षण झाल्याचे सांगण्यात आले.तालुक्यात माणिकपुंज, नाग्या-साक्या, चांदेश्वरी, गुळमोडी यासारखे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लहान-मोठे जलसाठे असून, त्यातले पाणी शेती व इतर कारणांसाठी उपसले गेले तर लातूरप्रमाणे येथे भीषण परिस्थिती उभी राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठे आरक्षित करण्याची प्रक्रि या अत्यंत गतिमान करण्याची गरज आहे. याशिवाय जलसंपदा विभाग व वीज वितरण कंपनी यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रि या नागरिकांमधून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी