शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

मखमलाबादच्या ग्रीन फिल्डचा महासभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:47 IST

मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात ग्रीन फिल्ड (हरित विकास क्षेत्र) अंतर्गत विकास करण्याच्या विषयावरून संबंधित शेतकऱ्यांमध्येच दोन गट आहेत.

नाशिक : मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात ग्रीन फिल्ड (हरित विकास क्षेत्र) अंतर्गत विकास करण्याच्या विषयावरून संबंधित शेतकऱ्यांमध्येच दोन गट आहेत. त्यातच एका गटाचा कडाडून विरोध होत असतानाच पुन्हा एकदा हा विषय येत्या बुधवारी (दि. २९) होणाºया महासभेत प्रशासनाने मांडला असून, त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रस्ताव असून, सुमारे साडेसातशे एकर क्षेत्रात आंतरराष्टÑीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी विकास आणि नियोजन प्राधीकरण म्हणून काम करणार आहे. त्यासाठी महापालिकेची संमती घेऊन इरादा जाहीर करण्याची प्रक्रिया राबवायची असल्याने हा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे. यापूर्वीदेखील हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, मखमलाबाद शिवारातील शेतकऱ्यांनी विरोध करून हा प्रस्ताव हाणून पाडला होता.ग्रीन फिल्ड प्रस्तावास सुरुवातीला सर्वच शेतकºयांचा विरोध होता. त्यानंतर अहमदाबाद येथे हा प्रकल्प पाहण्यासाठी शेतकºयांना नेण्यात आले होते त्यानंतर कालिदास कलामंदिरात नाशिकमधील प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण करतानाच शेतकºयांनी लाभाबाबत अनेक शंका विचारल्या होत्या. मात्र, आधी सर्वेक्षण होऊ द्या मगच लाभाचे गणित मांडू असे सांगण्यात आले होते. त्यानंतर सर्वेक्षण सुरू असताना पुन्हा एकदा महासभेत अशाच प्रकारे प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी शेतकºयांनी सर्वेक्षण बंद पाडून महासभेत धडक मारली होती. त्यामुळे हा विषय वगळ्यात आला. परंतु यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगरविकास योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या दृष्टिकोनातून तीन मॉडेल शेतकºयांसमोर मांडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार शेतकºयांनी ५० टक्के जमीन कंपनीला दिली आणि ५० टक्के त्यांनीच ठेवली, तर काय लाभ मिळतील. ५५-४५ तसेच ६०-४० या पद्धतीने जमिनीचे शेअरिंग केल्यास काय लाभ मिळू शकतील, याबाबतचे गणित पत्रकारांसमोर मांडले. तथापि, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू झाल्याने त्याचे शेतकºयांसमोर सादरीकरण झालेले नाही. परंतु अशा स्थितीत पुन्हा एकदा हा विषय २९ मे रोजी हा विषय चर्चेसाठी मांडण्यात आला आहे.शेतक-यांनी दिले होते विरोधाचे पत्रमखमलाबाद येथील काही शेतकºयांनी आचारसंहिता सुरू होण्याच्या दरम्यानच महापालिका आयुक्तांना विरोधाचे पत्र दिले आहे. त्यावरील सह्यांची छाननी करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले होते. परंतु, ही कार्यवाहीदेखील झालेली नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी