शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शासकीय नियम पाळत शाळेची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 23:37 IST

जळगाव नेऊर : कोरोनाच्या दहशतीमुळे अर्ध्याच्यावर शैक्षणिक वर्षं संपत आले; परंतु शिक्षण विभागाने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत २३ नोव्हेंबरपासून ...

ठळक मुद्देयेवला : तालुक्यातील १२१ शाळांमधून १३,२०३ विद्यार्थी घेत आहेत शिक्षण

जळगाव नेऊर : कोरोनाच्या दहशतीमुळे अर्ध्याच्यावर शैक्षणिक वर्षं संपत आले; परंतु शिक्षण विभागाने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येवला तालुक्यात शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षक, विद्यार्थी, पालक कंटाळले होते. त्यामुळे उत्साह असला तरी कोरोना संसर्ग अद्यापही कायम असल्याने शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरू होत आहे. राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे शालेय सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालकांना मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे पाठविल्या आहेत. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन यांच्याकडून प्राप्त कोविड-१९ नियमावलींचे पालन होणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा अनेक प्रश्नांमुळे पालकवर्ग चिंतित असला तरी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा हेतूही पालकांचा आहे.शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या सॅनिटाइझ केल्या आहेत. पुन्हा येत्या आठवड्यात वर्गखोल्या सॅनिटाइझ केले जातील, शिक्षण विभागाचे सर्व नियम पाळून पूर्ण विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येणार आहे.- एन.आर. दाभाडे, प्राचार्य, जळगाव नेऊर विद्यालय.गेली आठ महिन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती; पण शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू होत असल्याने आनंद झाला असून, विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे.- शरद तिपायले, पालक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा