शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शासनाकडून गटशेतीला प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:19 IST

नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. बहुतांश गटांचे कामकाज सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत या गटांच्या उत्पादनास प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचा प्रकल्प अहवाल पाहून त्यासाठी अनुदान निश्चित केले जात असून १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.

ठळक मुद्देएक कोटीपर्यंत अनुदान : जिल्ह्यात १६ गटांची स्थापना

नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. बहुतांश गटांचे कामकाज सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत या गटांच्या उत्पादनास प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचा प्रकल्प अहवाल पाहून त्यासाठी अनुदान निश्चित केले जात असून १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.शेतकऱ्यांचे पूरक उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, पाढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्यातील शेतकºयांची जमीनधारणा कमी असल्याने शेतकºयांच्या उत्पादनात भरीव वाढ होेण्यासाठी सामूहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत उत्पादक कंपनीमार्फत गट शेतीस प्रोत्साहन दिले जात आहे.या योजनेंतर्गत सेंद्रिय गूळ प्रक्रिया उद्योग, फळे व भाजापाला सामुदायिक विपणन व्यवस्था, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, कांदा व मका ग्रेडिंग पॅकिंग व विपनन, भाजीपाला व बेदाणा सोलर निर्जलीकरण प्रकल्प, कांदा प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया, आंबा व काजू फळ प्रक्रिया नागली, भात तृणधान्य प्रक्रिया आदी विविध प्रकल्प या गटांमार्फत सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गट उभारणी करताना येणाºया अडचणींबाबत आत्माच्या अधिकाºयांमार्फत शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. येवला तालुक्यातील वसुंधरा कृषी सेंद्रिय भाजापाला, फळे, शेतमाल विक्री गट मानोरी या गटाने यात भरारी घेतली असून, या गटाने गतिमानतेने काम करण्यास सुरुवात केली आहे. अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरूजिल्ह्णाला १२ गटांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दोन वर्षांत एकूण १६ गटांची स्थापना करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये पाच तर २०१८-१९ मध्ये अकरा गटांची स्थापना करण्यात आली आहे. १६ गटांमध्ये एकूण ५२३ शेतकºयांचा समावेश आहे. या गटांना ६०:२०:२० याप्रमाणे अनुदान देण्यात येते. गटाच्या प्रकल्पाचा ६० टक्के भार शासन उचलते तर २० टक्के बॅँकेचे कर्ज आणि २० टक्के गटाचा स्वनिधी याप्रमाणे भांडवल उभारणी केली जाते. सन १७-१८ मध्ये गटांना ६३.८१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. १८-१९ मधील गटांनाही अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी