शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शासनाकडून गटशेतीला प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:19 IST

नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. बहुतांश गटांचे कामकाज सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत या गटांच्या उत्पादनास प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचा प्रकल्प अहवाल पाहून त्यासाठी अनुदान निश्चित केले जात असून १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.

ठळक मुद्देएक कोटीपर्यंत अनुदान : जिल्ह्यात १६ गटांची स्थापना

नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. बहुतांश गटांचे कामकाज सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत या गटांच्या उत्पादनास प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचा प्रकल्प अहवाल पाहून त्यासाठी अनुदान निश्चित केले जात असून १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.शेतकऱ्यांचे पूरक उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, पाढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्यातील शेतकºयांची जमीनधारणा कमी असल्याने शेतकºयांच्या उत्पादनात भरीव वाढ होेण्यासाठी सामूहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत उत्पादक कंपनीमार्फत गट शेतीस प्रोत्साहन दिले जात आहे.या योजनेंतर्गत सेंद्रिय गूळ प्रक्रिया उद्योग, फळे व भाजापाला सामुदायिक विपणन व्यवस्था, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, कांदा व मका ग्रेडिंग पॅकिंग व विपनन, भाजीपाला व बेदाणा सोलर निर्जलीकरण प्रकल्प, कांदा प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया, आंबा व काजू फळ प्रक्रिया नागली, भात तृणधान्य प्रक्रिया आदी विविध प्रकल्प या गटांमार्फत सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गट उभारणी करताना येणाºया अडचणींबाबत आत्माच्या अधिकाºयांमार्फत शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. येवला तालुक्यातील वसुंधरा कृषी सेंद्रिय भाजापाला, फळे, शेतमाल विक्री गट मानोरी या गटाने यात भरारी घेतली असून, या गटाने गतिमानतेने काम करण्यास सुरुवात केली आहे. अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरूजिल्ह्णाला १२ गटांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दोन वर्षांत एकूण १६ गटांची स्थापना करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये पाच तर २०१८-१९ मध्ये अकरा गटांची स्थापना करण्यात आली आहे. १६ गटांमध्ये एकूण ५२३ शेतकºयांचा समावेश आहे. या गटांना ६०:२०:२० याप्रमाणे अनुदान देण्यात येते. गटाच्या प्रकल्पाचा ६० टक्के भार शासन उचलते तर २० टक्के बॅँकेचे कर्ज आणि २० टक्के गटाचा स्वनिधी याप्रमाणे भांडवल उभारणी केली जाते. सन १७-१८ मध्ये गटांना ६३.८१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. १८-१९ मधील गटांनाही अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी