शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

By admin | Updated: June 24, 2014 00:25 IST

सिन्नर : रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

सिन्नर : जून महिन्यातील तिसरा आठवडा उलटला आहे. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. सलग चौथ्या वर्षीही पावसाने दगा दिल्याने यंदाही खरीप हंगाम होतो की नाही या चिंतेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रविवारपासून आर्द्रा नक्षत्र मोर वाहनावर येत आहे. या नक्षत्रात पाऊस झाला तरच खरिपाच्या पेरण्या शक्य आहे. तथापि, उशीर झाल्यास पेरण्या वाया जातील, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. तीन वर्षांत सुमारे खरीप, रब्बी व उन्हाळी असे नऊ हंगामांतून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील बागायती क्षेत्रात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन हाती आले नसल्याने त्यातच अवकाळीचा दणका बसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असतानाच यंदा चांगला पाऊस होऊन खरीप हंगामात बरकत मिळेल, या भोळ्या आशेवर शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागले होते. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतींची कामे जवळपास पूर्ण झाली असूून, शेतकरी पावसाची आकाशाकडे डोळे लावून वाट पहात आहेत. मात्र जून महिना कोरडा जाऊ लागल्याने खरिपाच्या आशा धूसर होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊसच पडत नसल्याने सिन्नर शहरासह तालुक्यातील बी- बियाणे, खते व औषधांची विक्री करणारे कृषी सेवा केंद्रांमधून अद्याप खरेदीला सुरुवात झाली नसल्याने ही दुकाने ग्राहकांअभावी ओस पडल्याची स्थिती आहे. यंदा बी-बियाणे व खतांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. मात्र शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने खते व बियाण्यांसाठी मोठा खर्च करण्यापेक्षा शेतीच करावी की नाही अशा मनस्थितीपर्यंत शेतकरी पोहोचले आहेत. खते व बियाण्यांच्या किमतीत सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. (वार्ताहर)