शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

By admin | Updated: June 24, 2014 00:25 IST

सिन्नर : रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

सिन्नर : जून महिन्यातील तिसरा आठवडा उलटला आहे. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. सलग चौथ्या वर्षीही पावसाने दगा दिल्याने यंदाही खरीप हंगाम होतो की नाही या चिंतेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रविवारपासून आर्द्रा नक्षत्र मोर वाहनावर येत आहे. या नक्षत्रात पाऊस झाला तरच खरिपाच्या पेरण्या शक्य आहे. तथापि, उशीर झाल्यास पेरण्या वाया जातील, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. तीन वर्षांत सुमारे खरीप, रब्बी व उन्हाळी असे नऊ हंगामांतून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील बागायती क्षेत्रात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन हाती आले नसल्याने त्यातच अवकाळीचा दणका बसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असतानाच यंदा चांगला पाऊस होऊन खरीप हंगामात बरकत मिळेल, या भोळ्या आशेवर शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागले होते. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतींची कामे जवळपास पूर्ण झाली असूून, शेतकरी पावसाची आकाशाकडे डोळे लावून वाट पहात आहेत. मात्र जून महिना कोरडा जाऊ लागल्याने खरिपाच्या आशा धूसर होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊसच पडत नसल्याने सिन्नर शहरासह तालुक्यातील बी- बियाणे, खते व औषधांची विक्री करणारे कृषी सेवा केंद्रांमधून अद्याप खरेदीला सुरुवात झाली नसल्याने ही दुकाने ग्राहकांअभावी ओस पडल्याची स्थिती आहे. यंदा बी-बियाणे व खतांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. मात्र शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने खते व बियाण्यांसाठी मोठा खर्च करण्यापेक्षा शेतीच करावी की नाही अशा मनस्थितीपर्यंत शेतकरी पोहोचले आहेत. खते व बियाण्यांच्या किमतीत सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. (वार्ताहर)