शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

बळीराजा मिरवणुकीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:22 AM

कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.

नाशिक : कर्जमाफीचे गाजर दाखवून राज्य सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीसह शेतकºयांच्या आत्महत्यांसाठीही सरकारला जबाबदार धरून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील विविध शेतकरी संघटना आजही आग्रही आहेत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरात शुक्रवारी (दि.२०) बलीप्रतिपदेला गोल्फ क्लब ते अशोकस्तंभापर्यंत बळीराजा मिरणूक काढून सरकारविरोधी आंदोलन केले.  सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभरातील शेतकरी व वेगवेगळ्या शेतकरी संघटना आजही आग्रही आहोत, अशी भूमिका घेत सुकाणू समितीने शहरातून बळीराजा मिरवणूक काढली. सुकाणू समितीने सरकारवर कर्जमाफीचे गाजर दाखवून फसवणूक करण्याचा आरोप केला असून, सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.  सरकारने शेतकºयांना सरकट कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यभरात एक कोटी चार लाख शेतकरी आहेत. परंतु सरकारच्या जाचक अटींमुळे सुमारे ५८ लाख शेतकरी कर्जमाफीचे अर्जच करू शकलेले नाही, तर अर्ज करणाºया अनेक शेतकºयांनाही या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे वगळले जाणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे  राज्यात कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकºयांच्या आत्महत्या सुरू आहे.  या आत्महत्यांना सरकारचे शेती विरोधी घोरण जबाबदार असून, अशा शेती व शेतकरी विरोधी धोरणातील अंमलबजावणी करणाºया सरकारवर शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुकाणू समितीने बळीराजा मिरवणुकीच्या माध्यमातून केली असून, या मागण्यांचे निवेदनही पोलीस आयुक्तांना दिले आहे. पोलीस प्रशासनातर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सुकाणू समितीचे निवेदन स्वीकारले. सुकाणू समितीने काढलेल्या या बळीराजाची मिरवणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, किसानसभा आदी विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहर परिसरातील शेतकºयांनी सहभाग घेत आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला.