शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

निधीअभावी पाच वळण बंधारे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:46 AM

नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये खर्चाच्या या वळण योजनेसाठी आजवर शंभर कोटी रुपये भूसंपादनावर खर्च केले असून, शेतकºयांच्या जमिनीही खणून ठेवण्यात आल्या आहेत, आता प्रकल्पच रद्द केल्याने आदिवासी शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे खाते : जमिनी देणाऱ्या शेतकºयांचा संताप

नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये खर्चाच्या या वळण योजनेसाठी आजवर शंभर कोटी रुपये भूसंपादनावर खर्च केले असून, शेतकºयांच्या जमिनीही खणून ठेवण्यात आल्या आहेत, आता प्रकल्पच रद्द केल्याने आदिवासी शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.राज्यातील आघाडी सरकारने सन २००७ मध्ये दिंडोरी तालुक्यातील आंबाड, पायरपाडा, शृंगारपाडा, वाघाड-करंजवण व चिमणपाडा या पाच ठिकाणी वळण बंधारे बांधण्यास पाटबंधारे खात्याने मंजुरी दिली होती. या बंधाºयांमुळे या पाच भागात शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येऊन पुढे मांजरपाडा प्रकल्पाला ही बंधारे सहाय्यभूत ठरून या भागात सुमारे ४०० ते ४५० दशलक्ष घनफूट पाणी साठवण्यास व त्यामुळे प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येण्यास मदत झाली असते. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर पाटबंधारे खात्याकडून जमिनींचे संपादनाचे काम करण्यात आले. त्यासाठी रेडिरेकनर दरानुसार ५१ हजार रुपये एकरी भाव निश्चित करण्यात आल्यावर शेतकºयांनी विरोध दर्शविल्यावर थेट खरेदीद्वारे जमिनी संपादित करण्यात आल्या व शेतकºयांना बारा लाख रुपये हेक्टरी दर देण्यात आला. दरम्यान, या पाचही गावांच्या शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, सोमवारी आमदार झिरवाळ यांच्यासह शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. म्हणून चूप बसलो...आमदार नरहरी झिरवाळ यांनी वळण बंधारे रद्द करण्याच्या पाटबंधारे खात्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार फक्त घोषणा करते, कार्यवाही करीत नाही याचा अनुभव खूप वेळा आल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण काही न बोलता चूप बसलो, असे सांगितले.