शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

शासनाने मागविला कामांचा प्रगती अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:28 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिकेकडून मागविल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

नाशिक : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिकेकडून मागविल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.केंद्र शासनाकडून नाशिक शहराची स्मार्ट सिटीत निवड केल्यानंतर केंद्र, राज्य व महापालिका यांच्या संयुक्त निधीतून शहराला स्मार्ट बनविण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून केले जात असून, गेल्या दोन वर्षांत शहरात फारशी कामे झालेली नसली तरी पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली आहे. काही कामे वादात अडकली असून, अजूनही गोदा प्रकल्पासह काही कामांमुळे शहराचे रूप पालटले जाण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे विकासकामे सुरू असताना प्रत्यक्ष स्थिती काय हे समजावून घेण्यासाठी केंद्राच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने महापालिकेकडून ५० मुद्द्यांवर माहिती मागविली आहे.शहरातून व्हॅट, सेल टॅक्स किती मिळाला, घरपट्टी-पाणीपट्टीतून मिळणारा महसूल, शहरातील कच्चे-पक्के रस्ते किती किलोमीटर आहेत. कचरा संकलनाची स्थिती व यातून मिळणारे उत्पन्न, पाणीपुरवठा स्थिती-प्रति माणसी होणारा पाणीपुरवठा, उद्यानाची संख्या, शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी, शहरातील रोजगार व बेरोजगारांची स्थिती, वाहनांची संख्या, दररोज लागणारी वीज आदींसह इतर शासकीय विभागांशी संबंधित माहिती मागविण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी