शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

व्यावसायिकांना पायघड्या; अभ्यागतांना शिक्षा

By admin | Updated: October 13, 2015 00:10 IST

व्यावसायिकांना पायघड्या; अभ्यागतांना शिक्षा

नााशिक : पदाची आब व सुरक्षिततेचा विचार करून शासन दरबारी निवेदन देण्यासाठी येणाऱ्या विविध शिष्टमंडळात पाच पेक्षा अधिक व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश निषिद्ध असताना सोमवारी निवेदन देण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिकांना पायघड्या घालण्यात आल्या, पाचाच्या वीसपटीने दालनात थेट घुसलेल्या निवेदनकर्त्यांनी द्वारपालाला तर जुमानले नाहीच, परंतु शेकडोच्या संख्येने घुसखोरी करणाऱ्यांना दरडावावेसे जिल्हाधिकाऱ्यांनाही वाटले नाही. परिणामी दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यागतांना तासन् तास वाट पाहण्याची शिक्षा मात्र भोगावी लागली. शासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात थेट घुसखोरी केल्याच्या अनेकवार घटना घडल्या आहेत. काहींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडल्याचे, तर काहींनी दालनाबाहेर बसून जोरदार घोषणाबाजीही केल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात निवेदन देण्यासाठी दालनात घुसलेल्यांकडून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना चौफेर घेराव घालण्याचेही प्रकार घडले आहेत, त्यातून जिल्हाधिकाऱ्यांची गरिमा तर कमी झालीच, परंतु त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. मात्र कुशवाह यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अभ्यागतांसाठी नियमावली तयारी केलीच, परंतु निवेदन देण्यासाठी फक्त पाच व्यक्तींनाच दालनात प्रवेश देण्याची सक्तीची अट लादली. या नव्या नियमांच्या अंमलबजावणीने जिल्हाधिकाऱ्यांचे सुरक्षा रक्षक व द्वारपालांची डोकेदुखी कमी झाली, सोमवारी मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे सारे नियम पायदळी तुडविले गेले. निवेदन देण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी शेकडोच्या संख्येने घुसखोरी करताना दंडावर बांधलेल्या काळ्या फितीचे प्रदर्शन केले. त्यांना हटकण्याचे धाडस जिल्हाधिकाऱ्यांनीही दाखविले नाही. (प्रतिनिधी)