शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाऱ्या बाप्पांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:46 IST

नाशिक : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर होईलच शिवाय, विसर्जनावेळी नदीपात्रातील जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातील. शासनासह सेवाभावी संस्थांच्या या प्रयत्नांना बºयाच प्रमाणात यशही येत आहे. त्यात, आता मिट्टी फाउण्डेशनच्या अनोख्या प्रयोगाची भर पडली असून, विसर्जनानंतर चक्क पाणी शुद्ध करणाºयाच बाप्पांची निर्मिती करत प्रदूषण नियंत्रणाचा उपाय शोधला आहे.

ठळक मुद्देमिट्टी फाउण्डेशनचा अनोखा प्रयोग; तुरटीयुक्त पर्यावरणपूरक गणराय परदेशातही रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर होईलच शिवाय, विसर्जनावेळी नदीपात्रातील जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातील. शासनासह सेवाभावी संस्थांच्या या प्रयत्नांना बºयाच प्रमाणात यशही येत आहे. त्यात, आता मिट्टी फाउण्डेशनच्या अनोख्या प्रयोगाची भर पडली असून, विसर्जनानंतर चक्क पाणी शुद्ध करणाºयाच बाप्पांची निर्मिती करत प्रदूषण नियंत्रणाचा उपाय शोधला आहे.नाशिकमध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशमूर्ती घडविणाºया मोरे कुटुंबीयातील मयूर, हर्षद व ओंकार या तिघा मूर्तिकार बंधूंनी मिट्टी फाउण्डेशनची स्थापना केलेली आहे. पर्यावरण संवर्धन हा मुख्य उद्देश या फाउण्डेशनचा आहे. त्यानुसार, फाउण्डेशनचे प्रयोगशील मूर्तिकार मयूर मोरे यांनी गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाºया मूर्तीचीच निर्मिती केली आहे. या मूर्तीमध्ये तुरटीसह सेल्युलोज, गावरान गाईचे शेण व भौगोलिक परिस्थितीनुसार स्वदेशी बीज यांचा वापर करण्यात आला आहे. साधारपणे २ ते ३ किलो वजनाच्या मूर्तीत अंदाजे ३ हजार लिटर प्रदूषित पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. सदर मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्यामधील सेंद्रीय द्रव्ये तेथील पाण्याचे शुद्धीकरण करणारे जिवांणूसाठी खाद्य म्हणून उपयोगात येते शिवाय पीओपीच्या मूर्तीमुळे व त्यातील घातक रंगांमुळे होणारे प्रदूषणही बºयाच प्रमाणात कमी होण्याची क्षमता या मूर्तींमध्ये असल्याचा दावा मयूर मोरे यांनी केला आहे. मिट्टी फाउण्डेशनने या मूर्तींची निर्मिती करताना त्याच्या अनेकदा चाचण्या घेतल्या. त्यात यश आल्यानंतर त्यातील काही मूर्ती परदेशातदेखील रवाना झाल्या आहेत. प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी प्रतिलिटर ८५ मिलीग्रॅम या प्रमाणात तुरटी मिसळावी लागते. ‘ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी प्रोजेक्ट आॅफ ड्रिकिंग वॉटर ट्रिटमेंट’ या संशोधन प्रबंधात तुरटीचा उपयोग सांगितला आहे. ग्राफिन आॅक्साइडमुळे जल-शुद्धिकरण रसायनविरहित होते, असे वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने एका संशोधनाअंती सिद्ध केले आहे. तुरटी ही शुद्धिकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने मूर्तिकामात तिचा प्रमाणबद्ध वापर करण्यात आला. तुरटी पाण्यात मिसळल्यानंतर ती फॉस्फरस पार्टीकलसोबत मजबूत बंध निर्माण करते. पर्यावरणपूरक शाडूचे गणपती तयार करण्याची परंपरा आम्ही चार पिढ्यांपासून जोपासत आलो आहे. अजूनही लोक मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. या मूर्ती रासायनिक रंगांशिवाय खुलत नाहीत. रंगांचा पक्केपणा राहावा यासाठी त्यात फेसिन हे रसायन वापरतात. ते सडू नये यासाठी सोडीयम ट्रायक्लोरो फायनेट हे घातक रसायन वापरतात. रंग लवकर सुकावा यासाठी शिसे व पारा यांचा वापर करतात. हे नदीच्या पाण्यात मिसळल्याने प्रदूषण होते. ते टाळण्यासाठीच आम्ही हा प्रयोग केला आहे.- मयूर मोरे, संस्थापक, मिट्टी फाउण्डेशन.