शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाऱ्या बाप्पांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:46 IST

नाशिक : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर होईलच शिवाय, विसर्जनावेळी नदीपात्रातील जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातील. शासनासह सेवाभावी संस्थांच्या या प्रयत्नांना बºयाच प्रमाणात यशही येत आहे. त्यात, आता मिट्टी फाउण्डेशनच्या अनोख्या प्रयोगाची भर पडली असून, विसर्जनानंतर चक्क पाणी शुद्ध करणाºयाच बाप्पांची निर्मिती करत प्रदूषण नियंत्रणाचा उपाय शोधला आहे.

ठळक मुद्देमिट्टी फाउण्डेशनचा अनोखा प्रयोग; तुरटीयुक्त पर्यावरणपूरक गणराय परदेशातही रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर होईलच शिवाय, विसर्जनावेळी नदीपात्रातील जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातील. शासनासह सेवाभावी संस्थांच्या या प्रयत्नांना बºयाच प्रमाणात यशही येत आहे. त्यात, आता मिट्टी फाउण्डेशनच्या अनोख्या प्रयोगाची भर पडली असून, विसर्जनानंतर चक्क पाणी शुद्ध करणाºयाच बाप्पांची निर्मिती करत प्रदूषण नियंत्रणाचा उपाय शोधला आहे.नाशिकमध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशमूर्ती घडविणाºया मोरे कुटुंबीयातील मयूर, हर्षद व ओंकार या तिघा मूर्तिकार बंधूंनी मिट्टी फाउण्डेशनची स्थापना केलेली आहे. पर्यावरण संवर्धन हा मुख्य उद्देश या फाउण्डेशनचा आहे. त्यानुसार, फाउण्डेशनचे प्रयोगशील मूर्तिकार मयूर मोरे यांनी गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाºया मूर्तीचीच निर्मिती केली आहे. या मूर्तीमध्ये तुरटीसह सेल्युलोज, गावरान गाईचे शेण व भौगोलिक परिस्थितीनुसार स्वदेशी बीज यांचा वापर करण्यात आला आहे. साधारपणे २ ते ३ किलो वजनाच्या मूर्तीत अंदाजे ३ हजार लिटर प्रदूषित पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. सदर मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्यामधील सेंद्रीय द्रव्ये तेथील पाण्याचे शुद्धीकरण करणारे जिवांणूसाठी खाद्य म्हणून उपयोगात येते शिवाय पीओपीच्या मूर्तीमुळे व त्यातील घातक रंगांमुळे होणारे प्रदूषणही बºयाच प्रमाणात कमी होण्याची क्षमता या मूर्तींमध्ये असल्याचा दावा मयूर मोरे यांनी केला आहे. मिट्टी फाउण्डेशनने या मूर्तींची निर्मिती करताना त्याच्या अनेकदा चाचण्या घेतल्या. त्यात यश आल्यानंतर त्यातील काही मूर्ती परदेशातदेखील रवाना झाल्या आहेत. प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी प्रतिलिटर ८५ मिलीग्रॅम या प्रमाणात तुरटी मिसळावी लागते. ‘ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी प्रोजेक्ट आॅफ ड्रिकिंग वॉटर ट्रिटमेंट’ या संशोधन प्रबंधात तुरटीचा उपयोग सांगितला आहे. ग्राफिन आॅक्साइडमुळे जल-शुद्धिकरण रसायनविरहित होते, असे वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने एका संशोधनाअंती सिद्ध केले आहे. तुरटी ही शुद्धिकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने मूर्तिकामात तिचा प्रमाणबद्ध वापर करण्यात आला. तुरटी पाण्यात मिसळल्यानंतर ती फॉस्फरस पार्टीकलसोबत मजबूत बंध निर्माण करते. पर्यावरणपूरक शाडूचे गणपती तयार करण्याची परंपरा आम्ही चार पिढ्यांपासून जोपासत आलो आहे. अजूनही लोक मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. या मूर्ती रासायनिक रंगांशिवाय खुलत नाहीत. रंगांचा पक्केपणा राहावा यासाठी त्यात फेसिन हे रसायन वापरतात. ते सडू नये यासाठी सोडीयम ट्रायक्लोरो फायनेट हे घातक रसायन वापरतात. रंग लवकर सुकावा यासाठी शिसे व पारा यांचा वापर करतात. हे नदीच्या पाण्यात मिसळल्याने प्रदूषण होते. ते टाळण्यासाठीच आम्ही हा प्रयोग केला आहे.- मयूर मोरे, संस्थापक, मिट्टी फाउण्डेशन.