शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

निर्यातबंदीमुळे दर कमी होण्याची उत्पादकांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:26 IST

लासलगाव (नाशिक): केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लासलगाव (नाशिक): केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सन १९९८ नंतर तब्बल २१ वर्षानी लादलेली कांदा निर्यातबंदीचा निर्णय साडेपाच महिन्यानंतर दि.१५ मार्चपासुन उठवल्यानंतर भावात तेजी आल्याचा धसका घेत सहा महिन्याचे आतच दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने नोटीफिकेशन नंबर ३१/२०१५-२० हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संचलक अमित यादव यांच्या सहीने नोटीफिकेशन जारी केले. परत निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे. केवळ कांदा उत्पादक असंघटित आहे.म्हणुन केंद्र शासन फक्त कांदा पिकाला वेठीस धरीत आहे. कांदा निर्यातबंदी जाहीर करण्याऐवजी आजचे बाजारभावाने शासनाने कांदा खरेदी करून दिलासा न देता कांदा उत्पादकांच्या जखमेवर मिठ चोळले आहे.याचा परिणाम भाव कमी होण्याची भिती आहे असा आरोप कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी संताप व्यक्त केला .आगामी देशातील काही राज्यात निवडणुका होत असल्याने हा निर्णय घेतला असावा असे जाणकारांचे मत आहे. कांद्याची निर्यात ही आखाती देश, आग्नेय आशियायी, आखाती हे भारतासारखे खानपान असणारे देश भारतीय कांद्याचे ग्राहक आहेत. भारतात कांद्याचे दर वाढले की इतर देशांतही दर वाढतात. आजघडीला पाकिस्तानमधील कांद्याचा दर ही भारताच्या रेंजमध्ये आहे. भारत ज्या प्रकारचा कांदा पिकवतो, त्याच्या निर्यात मार्केटमध्ये भारताचा सर्वांत मोठा वाटा आहे. भारताची गरज भागवू शकेल इतका सरप्लस जगात कुठल्याही देशात नसतो. भारतीय कांद्याचा रंग,आकार,चव आणि झटका पाकिस्तान वगळता अन्य देशातील कांद्यात नसतो. त्यामुळे भारताला फक्त भारतीय शेतकरीच कांदा खावू घालू शकतो. भारतीय कांदा निर्यातीचा आकडा पाकिस्तानच्या एकूण कांदा उत्पादनापेक्षा जास्त असतो.

टॅग्स :Nashikनाशिक