शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निर्यातबंदीमुळे दर कमी होण्याची उत्पादकांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:26 IST

लासलगाव (नाशिक): केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लासलगाव (नाशिक): केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सन १९९८ नंतर तब्बल २१ वर्षानी लादलेली कांदा निर्यातबंदीचा निर्णय साडेपाच महिन्यानंतर दि.१५ मार्चपासुन उठवल्यानंतर भावात तेजी आल्याचा धसका घेत सहा महिन्याचे आतच दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने नोटीफिकेशन नंबर ३१/२०१५-२० हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संचलक अमित यादव यांच्या सहीने नोटीफिकेशन जारी केले. परत निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे. केवळ कांदा उत्पादक असंघटित आहे.म्हणुन केंद्र शासन फक्त कांदा पिकाला वेठीस धरीत आहे. कांदा निर्यातबंदी जाहीर करण्याऐवजी आजचे बाजारभावाने शासनाने कांदा खरेदी करून दिलासा न देता कांदा उत्पादकांच्या जखमेवर मिठ चोळले आहे.याचा परिणाम भाव कमी होण्याची भिती आहे असा आरोप कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी संताप व्यक्त केला .आगामी देशातील काही राज्यात निवडणुका होत असल्याने हा निर्णय घेतला असावा असे जाणकारांचे मत आहे. कांद्याची निर्यात ही आखाती देश, आग्नेय आशियायी, आखाती हे भारतासारखे खानपान असणारे देश भारतीय कांद्याचे ग्राहक आहेत. भारतात कांद्याचे दर वाढले की इतर देशांतही दर वाढतात. आजघडीला पाकिस्तानमधील कांद्याचा दर ही भारताच्या रेंजमध्ये आहे. भारत ज्या प्रकारचा कांदा पिकवतो, त्याच्या निर्यात मार्केटमध्ये भारताचा सर्वांत मोठा वाटा आहे. भारताची गरज भागवू शकेल इतका सरप्लस जगात कुठल्याही देशात नसतो. भारतीय कांद्याचा रंग,आकार,चव आणि झटका पाकिस्तान वगळता अन्य देशातील कांद्यात नसतो. त्यामुळे भारताला फक्त भारतीय शेतकरीच कांदा खावू घालू शकतो. भारतीय कांदा निर्यातीचा आकडा पाकिस्तानच्या एकूण कांदा उत्पादनापेक्षा जास्त असतो.

टॅग्स :Nashikनाशिक