शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

समस्यांमुळे नवनिर्मितीस चालना मिळते :  संदीप शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:43 IST

स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते.

सातपूर : स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते. त्यामुळे समस्यांकडे नकारात्मकतेने न बघता त्यातून मार्ग काढत परिणामकारकता कशी साध्य करता येईल याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक टीसीएस इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख संदीप शिंदे यांनी केले.अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात निमा जीआयझेड आयएफसीतर्फे आयोजित ‘इनोव्हेशन कॅम्प’मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जीआयझेडचे तंत्रज्ञ तसव्वर अली यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असून ‘स्टुडंट इनोव्हेशन प्रोजेक्ट’ च्या माध्यमातून उद्योगातील विविध प्रक्रिया व त्यात येणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक काळातच विकसित होण्यास मदत होते. उद्योजक मनीष रावल यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून उत्पादन व संबंधित प्रक्रियांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल अशा तांत्रिक विकल्पांची माहिती मिळाल्याचे मनोगतात सांगिलते. प्रास्ताविक निमा जीआयझेड आयएफसीचे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांनी केले. परीक्षित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी कमलेश नारंग, समीर पटवा, मितेश पाटील, अखिल राठी, श्रीपाद कुलकर्णी, उदय रकिबे तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योजक व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.३० प्रकल्प सादरया उपक्रमातील पहिल्या टप्प्यात तीन महाविद्यालयातील ११३ विद्यार्थ्यांच्या गटाने एकूण ३० प्रोजेक्ट्स केले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत उत्पादन व प्रक्रियांमध्ये नवनिर्मितीस चालना मिळावी यासाठी निमा व शैक्षणिक संस्था यांच्या प्रयत्नांची माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी