शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

मोबाईलमुळे खाजगी पत्रव्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 18:31 IST

चांदोरी : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी संदेशासाठी पत्राचा वापर करण्यात येत असे. परंतु, आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेटमुळे आता खासगी पत्रव्यवहारच बंद झाला असून, पत्रपेट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देस्पिड पोस्टचा वापर...

चांदोरी : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी संदेशासाठी पत्राचा वापर करण्यात येत असे. परंतु, आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेटमुळे आता खासगी पत्रव्यवहारच बंद झाला असून, पत्रपेट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. इंटरनेट व मोबाईलमुळे काही क्षणातच संपर्क होत आहे. त्यामुळे आता खाजगी पत्रव्यवहार बंद झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी गावात पोस्टमन आला की, नागरिकांना आपले नातेवाईकाचे पत्र आले का ?याची उत्सुकता असे. नागरिक मोठ्या आतुरतेने चौकशी करित होते. परंतु, आता मोबाईलच्या बोलबालामुळे डाक कार्यालयाचे खासगी महत्त्व कमी झाल्याचे दिसून येत आहे.सध्या केवळ डाक कार्यालयातून शासकीय कामकाजाचा पत्रव्यवहार होत आहे. त्यात नोकरीचे आदेश, बँकाची नोटीस, न्यायालयाच्या नोटीसा व कागदपत्र, सहकारी सोसायटीचे अहवाल, विमा पॉलिसी प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, बँकेचे चेकबुक, एटीएम कार्ड आदींसाठी पोस्ट कार्यालयाचा वापर होत आहे.स्पिड पोस्टचा वापर... खाजगी पत्रव्यवहार कमी झाला असला तरी स्पीड पोस्टचा वापर कायम आहे. डाक कार्यालयातील ऑनलाईन सेवेमुळे आता पैसे ट्रान्सफरही होत आहेत.- संदीप आवारे, पोस्टमन.

टॅग्स :MobileमोबाइलPost Officeपोस्ट ऑफिस