शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

नागरिकांचा जीव वाचविण्याला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे प्रथम प्राधान्यावर आहे. नागरिकांचे जीव वाचविणे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. लोकांचा ...

नाशिक : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे प्रथम प्राधान्यावर आहे. नागरिकांचे जीव वाचविणे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. लोकांचा जीव धोक्यात आलेला असताना केवळ विकासाचा विचार करण्यापेक्षा जीवांचा विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला पाहिजे यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मालेगाव व नाशिक जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकार नागरिकांच्या जीवाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढला असल्याने रुग्णांना बेड, रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळत नाही. त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्ण ठेवायलादेखील जागा मिळणार नाही. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे.

नागरिकांनीदेखील आधीच सावध झाले पाहिजे, बंधने पाळली नाहीत तर प्रयत्न हाताबाहेर जातील. त्यामुळे पंधरा दिवसांचे कडक निर्बंध पाळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

--इन्फो--

साठेबाजांवर कठोर कारवाई

रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होत आहे. त्यात बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. दोन-तीन दिवसांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. रेमडेसिविरचा गैरप्रकार करणारे, तसेच जादा दराने विक्री करताना आढळून येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला.