शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळीची कमतरता दुकानदारांचे प्रथम येणाºयास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:21 IST

अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडले असून, आता तूरडाळ वाटपासाठी ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ देण्याची पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्यांना रेशनमधून तूरडाळ मिळणार नाही, त्यांचा रोष रेशन दुकानदारांना सोसावा लागणार आहे.

नाशिक : अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडले असून, आता तूरडाळ वाटपासाठी ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ देण्याची पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्यांना रेशनमधून तूरडाळ मिळणार नाही, त्यांचा रोष रेशन दुकानदारांना सोसावा लागणार आहे.  राज्य सरकारने गेल्या वर्षी आधारभूत किमतीत खरेदी केलेली तूरडाळ यंदा रेशनमधून ५५ रुपये किलोप्रमाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यांना तूरडाळीचा कोटाही मंजूर करण्यात आला असून, पंधरा दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने नाशिक जिल्ह्यासाठी ४२९५ क्विंटल तूरडाळ देण्यास मान्यता दिली. जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या सव्वा सात लाखांच्या आसपास असून, पुरवठा खात्याने मंजूर केलेली तूरडाळीचे शिधापत्रिकेशी तुलनात्मक प्रमाण पाहता, साधारणत: ५६ टक्के इतकाच पुरवठा झाला आहे त्यामुळे एका शिधापत्रिकाधारकास अर्धा किलो वा ५६० ग्रॅम तूरडाळ देण्याचे नियोजन पुरवठा खात्याने केले होते. परंतु मार्केट फेडरेशनने तूरडाळीचे प्रत्येकी एक किलो वजनाचे पॅकबंद पाकिट करून देण्याच्या शासनाच्या सूचना असल्यामुळे प्राप्त होणारी तूरडाळ खुली करून विक्री करणे शक्य नसल्याने पुरवठा खाते पेचात सापडले आहे. त्यावर उपाय म्हणून आता तालुक्यांना वाटप करण्यात आलेली तूरडाळ प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यातही प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.  तूरडाळ घेण्यास जो अगोदर येईल त्यालाच रेशन दुकानदार विक्री करेल, तूरडाळ संपल्यावर जो शिधापत्रिकाधारक येईल त्याला मात्र ती मिळणार नाही. अशा वेळी रेशन दुकानदाराशी खटके उडण्याचा संभव अधिक आहे. त्यामुळे शासनाने शिधापत्रिका धारकांच्या प्रमाणात तूरडाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक