शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

तत्वत: कर्जमाफी निर्णयाचे स्वागत

By admin | Updated: June 12, 2017 00:23 IST

जल्लोष : जिल्हाभरात शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यानंतर या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिंकाणी शेतकऱ्यांनी फटाके फोडत निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.खामखेडा येथे घोषणाबाजीशेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ केले आहे. नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकरी एकजूटीचा हा विजय आहे. या निर्णयामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. या निर्णयाचे खामखेडा येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. खामखेडा चौफुलीवर शेतकऱ्यांनी शेतकरी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सरपंच सोनवणे उपसरपंच संतोष मोरे, सोसायटीचे चेअरमन नानाजी मोरे, शांताराम शेवाळे, सुनिल शेवाळे, दादाजी निंबा बोरसे, संजय मोरे, जिभाऊ बोरसे, बापू शेवाळे, विश्वास शेवाळे, विठ्ठल शेवाळे, गोकुळ मोरे, वैभव पवार , दिनकर आहेर , महेश शिरोरे, रमेश मोरे , सुभाष बिरारी, बापू सोनवणे आदी उपस्थित होते. लासलगावी आनंदशेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. सुकाणू समतिी व सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत तोडगा निघाला. कर्जमाफीच्या निर्णयानंतर लासलगाव व टाकळी फाट्यावर पंचायत समतिी सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्याच प्रमाणे खळकमाळेगाव, वाळकेवाडी, खानगाव, उगाव, वनसगाव, शिवडी आदी परिसरात शेतकर्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. डोक्यावरील कर्जाचं ओझं हलकं झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.ब्राम्हणगाव येथील सुनील गवळी, सोमनाथ जाधव, मंगेश गवळी, विशाल गायकवाड, संदीप गवळी, संदीप चव्हाण, विष्णू लुटे, आंबदास जाधव, संतोष निफाड आदींनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. निफाडसह लासलगाव व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात निफाड लासलगाव व परिसरातील शेतकर्यांनी झोकून दिलं होतं. फक्त ५ एकर पर्यतच्या अल्प भूधारकांनाच लाभ मिळणार आहे. उदा. ज्या खातेदारांना चार मुले आहेत पण खाते एकाच्याच नावावर आहे, अशा खातेदारांना कर्ज माफी मिळणार नाही. तर जो शेतकरी अल्पभुधारक आहे पण शेतीला पुरक असा जोडधंदा करतो. आणि व्यवसायाचा प्राप्तीकर भरीत असल्यास त्याच्या आधार कार्डवरु न आॅनलाईन दिसून येणारच. अशा अल्पभुधारक शेतकर्याला देखील कर्जमाफी मिळणार नाही. घोषणा समाधानकारक म्हणता येणार नाही. - रामदास वारुणसे, त्र्यंबकेश्वर

रोज मरण्यापेक्षा एकदाच मरू ह्या बळीराजाच्या भुमिकेचा विजय झाला आहे. पहाटेच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्याने वेगळा पवित्रा घेतल्याने लढ्याला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. राज्य शासनाला जाग आणण्यासाठी बळीराजाला मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागले. बळीराजाला सरसकट कर्जमाफीबरोबरच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्याला संजीवनी देणारा ऐतिहासीक निर्णय ठरेल.-पुरु षोत्तम कडलग,सदस्य, किसान क्रती