शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

तत्वत: कर्जमाफी निर्णयाचे स्वागत

By admin | Updated: June 12, 2017 00:23 IST

जल्लोष : जिल्हाभरात शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यानंतर या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिंकाणी शेतकऱ्यांनी फटाके फोडत निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.खामखेडा येथे घोषणाबाजीशेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ केले आहे. नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकरी एकजूटीचा हा विजय आहे. या निर्णयामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. या निर्णयाचे खामखेडा येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. खामखेडा चौफुलीवर शेतकऱ्यांनी शेतकरी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सरपंच सोनवणे उपसरपंच संतोष मोरे, सोसायटीचे चेअरमन नानाजी मोरे, शांताराम शेवाळे, सुनिल शेवाळे, दादाजी निंबा बोरसे, संजय मोरे, जिभाऊ बोरसे, बापू शेवाळे, विश्वास शेवाळे, विठ्ठल शेवाळे, गोकुळ मोरे, वैभव पवार , दिनकर आहेर , महेश शिरोरे, रमेश मोरे , सुभाष बिरारी, बापू सोनवणे आदी उपस्थित होते. लासलगावी आनंदशेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. सुकाणू समतिी व सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत तोडगा निघाला. कर्जमाफीच्या निर्णयानंतर लासलगाव व टाकळी फाट्यावर पंचायत समतिी सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्याच प्रमाणे खळकमाळेगाव, वाळकेवाडी, खानगाव, उगाव, वनसगाव, शिवडी आदी परिसरात शेतकर्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. डोक्यावरील कर्जाचं ओझं हलकं झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.ब्राम्हणगाव येथील सुनील गवळी, सोमनाथ जाधव, मंगेश गवळी, विशाल गायकवाड, संदीप गवळी, संदीप चव्हाण, विष्णू लुटे, आंबदास जाधव, संतोष निफाड आदींनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. निफाडसह लासलगाव व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात निफाड लासलगाव व परिसरातील शेतकर्यांनी झोकून दिलं होतं. फक्त ५ एकर पर्यतच्या अल्प भूधारकांनाच लाभ मिळणार आहे. उदा. ज्या खातेदारांना चार मुले आहेत पण खाते एकाच्याच नावावर आहे, अशा खातेदारांना कर्ज माफी मिळणार नाही. तर जो शेतकरी अल्पभुधारक आहे पण शेतीला पुरक असा जोडधंदा करतो. आणि व्यवसायाचा प्राप्तीकर भरीत असल्यास त्याच्या आधार कार्डवरु न आॅनलाईन दिसून येणारच. अशा अल्पभुधारक शेतकर्याला देखील कर्जमाफी मिळणार नाही. घोषणा समाधानकारक म्हणता येणार नाही. - रामदास वारुणसे, त्र्यंबकेश्वर

रोज मरण्यापेक्षा एकदाच मरू ह्या बळीराजाच्या भुमिकेचा विजय झाला आहे. पहाटेच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्याने वेगळा पवित्रा घेतल्याने लढ्याला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. राज्य शासनाला जाग आणण्यासाठी बळीराजाला मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागले. बळीराजाला सरसकट कर्जमाफीबरोबरच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्याला संजीवनी देणारा ऐतिहासीक निर्णय ठरेल.-पुरु षोत्तम कडलग,सदस्य, किसान क्रती