शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कडवा कालव्यातील पाणीचोरी रोखा

By admin | Updated: December 3, 2015 23:18 IST

शेतकरी आक्रमक : डोंगळे टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आमदारद्वयींच्या उपस्थितीत इशारा

सिन्नर : कडवा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर कडवा कालव्यातून होणारी पाणीचोरी थांबवून पोटभर पाणी देण्याची मागणी अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकऱ्यांनी केली. पाणीचोरी, गळती व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत होते. शेतकऱ्यांनी बैठकीत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत त्यांना चांगलेच धारेवर धरले.येथील कडवा विश्रामगृहाच्या प्रांगणात सिन्नर, निफाड, नाशिक व इगतपुरी तालुक्यातील कालवा सल्लागार समितीची बैठक सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे व निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत पार पडली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, नवनाथ मुरडनर, विजय काटे, शिवसेनेचा तालुकाप्रमुख दीपक खुळे, कडवाचे उपअभियंता प्रशांत सगभोर, निफाडचे पंचायत समिती सदस्य सोपान खालकर, बांधकामचे उपअभियंता आर.बी. टाटिया आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कडवा धरणातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत न पोहचल्याने शेतकरी आक्रमक होतील हे गृहीत धरून या बैठकीला प्रथमच पोलीस बंदोबस्त दिसून आला. बैठकीच्या प्रारंभीच शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करीत आक्रमक पवित्रा धारण केल्याचे दिसून आले. पाटबंधारे विभागाने अचानक बैठक घेऊन पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना आमंत्रित का केले नाही या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांनी एकाच वेळी अनेक प्रश्नांचा भडिमार केल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत होती. शेवटच्या टोकापर्यंत पाणी किती दिवसात पोहोचेल या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी हट्ट धरल्याचेही दिसून आले. पाटबंधारे खात्याचे कर्मचारी पाणी विकत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांचा रोष पाहून कार्यकारी अभियंता शिंदे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पैसे घेऊन कोणी पाणी विकत असेल तर आपल्याकडे तक्रार करावी, असे त्यांनी सांगितले. रब्बीच्या सिंचनासाठी ५०३ व बिगर सिंचनासाठी २२५ असे ७२८ दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांना पाणी मिळावे अशी पाटबंधारे विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगून शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. पाण्याच्या मागणीचे अर्ज करा, असे आवाहन त्यांनी केले. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पिकांची अवस्था वाईट असून, तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर १२ ते १५ डिसेंबरदरम्यान आवर्तन सोडण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. आवर्तन सोडण्यासाठी पूर्वतयारीला वेळ लागतो असे उपअभियंता प्रशांत सगभोर यांनी सांगितले. याप्रसंगी निफाडचे शेतकरी बोलण्यास उठल्यानंतर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. सर्वांचे साध्य एकच असल्याने शेतकऱ्यांनी बेकीचे नव्हे तर एकीचे प्रदर्शन दाखवावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उशीर का झाले याचे कारण सांगतानाच त्यांनी यात राजकारण आणू नका अशी विनंती केली. शेतकऱ्यांनी वाद न घातला लवकरात लवकर पाणी कसे सुटेल यासाठी सहकार्य करावे तसेच शेतकऱ्यांनी स्वत:हून आपले डोंगळे काढून घ्यावे, असे आवाहन वाजे यांनी केले. वडांगळी यात्रेला पाणी कमी पडले तर प्रशासनाकडून टॅँकर उभे करून देऊ, असे आश्वासन वाजे यांनी यावेळी दिले. यावेळी वाजे यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धरणावर करण्यात आलेल्या प्रतीकात्मक आंदोलनाची माहिती दिली. यावेळी आमदार अनिल कदम यांनी एकाच आवर्तनात सर्व पाणी सोडल्यानंतर भविष्यात त्याची दाहकता जाणवेल अशी भीती व्यक्त केली. शिस्त ठेवली तरच सर्वांना पाणी मिळेल असे सांगतांना त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला. सर्वांना पाणी देण्याची प्रशासनाची कसोटी असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पाणीवापर संस्थेच्या वतीने सतीश कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना अडीअडचणींचा पाढा वाचतानाच गळती रोखण्याचे आवाहन केले. नको तिथे कामे करून कालव्याच्या दुरुस्तीसाठी मिळालेल्या ५३ कोटी रुपयांचा दुरुपयोग होत असल्याकडे कोकाटे यांनी लक्ष वेधले. कालवा दुरुस्तीसाठी असलेल्या जेसीबीच्या डिझेलची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, सोपान खालकर यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)