शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

दुष्काळी स्थितीत फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाकडून उपायययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:46 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ठळक मुद्दे नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन घोटीचे मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य फळबागांसाठी भयानक ठरत आहे. पाण्याचे संकट, रोज आटत चाललेले जलस्रोत यामुळे बागा वाचवण्याचे शेतकºयांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. इगतपुरी तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास हजारो हेक्टरवर आहे. त्यामध्ये विविध फळपिक बागांचा समावेश आहे.यावर्षी केलेली नवी लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकºयांकडे आहे. शिवाय दरिदवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दुरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचिवता येतील का यासाठी कृषी विभागाने वाचवा अभियान हाती घेतले आहे. तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी ह्याबाबत शेतकºयांना प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे.फळबाग वाचवा अभियानात सुचिवलेल्या उपायांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहितीपत्रकाच्या माध्यमातून शेतकºयांना सजग करण्याचे काम केले जात असल्याचे श्री. पगारे यांनी सांगितले.उपाययोजना सांगतांना अरविंद पगारे यांनी झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती शेतकºयांना दिली आहे. ही माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम केले आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोचिवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अभियानात आच्छादनाचा वापर, मडका सिंचनाचा उपयोग, सलाइनच्या बाटल्यांचा वापर, खोडास बोर्डोपेस्ट लावणे, शेडनेटची सावली करणे, बाष्परोधकांचा वापर, ठिबक सिंचन, बोर्डोपेस्टचा वापर करताना घ्यावयाची काळजी, झाडांचा पनोळा, फळ संख्या कमी करणे आदी उपायांचा जागर करण्यात येत असून शेतकरी प्रतिसाद देत आहेत.