शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

वणी परिसरात पावसाची हजेरी शेतकरीवर्गात समाधान व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:49 IST

वणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देटमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम

लोकमत न्युज नेटवर्कवणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवासांपासुन पावसाची हजेरी तुरळक लागत होती. त्यामुळे टमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पुरेशा पावसाअभावी होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न होता. पावासात तितकासा जोर नसल्याने व त्यात सातत्य नसल्याने पिके हातची जातात की काय? अशी भिती व्यक्त केली जात होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे व शेतकरीवर्गाची तुर्त चिंता मिटली आहे.द्राक्ष, टमाटा व ऊस ही पिके प्रामुख्याने घेण्याकडे कल शेतकरीवर्गाचा असायचा पण गेल्या काही वर्षापासुन सोयाबीन उत्पादनासाठी अग्रक्र म दिला जातो आहे. सोयाबीन हे साठवणुकीसाठी योग्य असुन वातावरणाचा परिणाम त्यावर होत नाही. तसेच बाजारपेठेच्या आडाख्याचा अभ्यास करु न विक्र ी केली तर आर्थिक गणित जमुन येते असा अनुभव आल्याने उत्पादकांचा कल सोयाबीनकडे आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बारा पाडे व गावामधे भातशेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते, कारण या भागातील जमिन भातशेतीसाठी कसदार व अधिक उत्पन्न देणारी आहे. त्यामुळे आदीवासी बांधव भाताचे उत्पादन घेतात. त्याबरोबर टमाटा लागवडही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता होती ती गरज गेल्या दोन दिवसांपासुन पुर्ण होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतामुक्त झाला आहे. (फोटो १७ सोयाबीन)

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी