शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

कुंभमेळ्यात दिशादर्शक फलक लावण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी

By admin | Updated: April 5, 2015 00:47 IST

कुंभमेळ्यात दिशादर्शक फलक लावण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी

नाशिक : महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने सिंहस्थ कामे रखडल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला खरा; परंतु याच महापालिकेने केवळ कुंभमेळ्यात दिशादर्शक फलक लावण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. नाशिकमध्ये इतक्याप्रमाणात फलक लावण्यामागे पालिकेची काटकसर आहे की उधळपट्टी असा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे.जकात रद्द झाल्यापासून महापाालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. एलबीटी पुरेसा वसूल होत नसतानाच महापालिकेवर कुंभमेळ्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महापालिकेने कुंभमेळ्यासाठी आधी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांना आराखडा तयार केला होता. राज्य शासनाने त्यात कपात करून एक हजार ५२ कोटी रुपयांचा केला आहे; परंतु एक हजार कोटी रुपयांची कामे करणे शक्य नसल्याने राज्यशासनाकडे ९० टक्के निधी देण्याची मागणी केली होती; परंतु शासन तयार नव्हते. बऱ्याच परिश्रमानंतर राज्यशासनाने ६६ टक्के निधी देण्याची तयारी केली म्हणजे ३३ टक्के निधी महापालिकेने खर्च करायचा आहे; परंतु त्यासाठीही पुरेसा निधी नाही. त्यामुळे कर्ज काढण्याची तयारी केली असून, सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे. महापालिकेकडे निधी नाही म्हणून २ एप्रिल रोजी सत्तारूढ मनसेचे नेता राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शासनावर खापर फोडले. एकीकडे अशाप्रकारे आर्थिक परिस्थितीचे रडगाणे गायले जात असताना दुसरीकडे,मात्र कुंभमेळ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात फलक लावण्यासाठी १४ कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या आहेत. या निविदा अधिक दराच्या आल्यास हे काम चौदा कोटी रुपयांच्या आतच होईल हे सांगता येत नाही. अशा स्थितीत पालिकेला हे परवडणारे आहे काय?