शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 15:35 IST

लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी (दि.२) लासलगाव बाजार समिती आवारात बाजारभाव ८०० ते २२०० रुपये व सरासरी १८५० रुपये राहिले. तर पिंपळगावी प्रतिक्विंटल २५०० रुपये भाव जाहीर झाला होता. दरम्यान, कांदा भावात हळूहळू तेजी येत असतांनाच आता बांगलादेश सरकारने बुधवार दि.२ जून पासून कांदा आयातीचा परवाना देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कांदा निर्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे.लासलगांव येथे बुधवारी दिवसभरात १८ हजार ३०० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव होऊन ८०० ते २२०० रुपये व सरासरी १८५० रूपये बाजारभाव राहिला. मंगळवारी (दि.१) दिवसभरात २५ हजार ९०० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव होऊन ६०० ते २१५२ व सरासरी १८०० रूपये भाव राहिला. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार २०५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ६००, कमाल २०२१ तर सर्वसाधारण १५७६रुपये प्रती क्विंटल होते. दरम्यान,जिल्ह्यातील दिंडोरी व वणी बाजार समितीमध्ये कांद्यांची आवक होत असुन खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाला यंदा कांदा आधार देणार, असे चित्र दिसत आहे. दिंडोरी व वणी बाजार समितीत मे महिन्यात जवळपास ८० हजार ३६७ क्किंटल कांद्याची आवक झाली. तर बाजारभाव साधारणपणे७७८ ते २१७२ रूपये व सरासरी १४५० रूपये इतके राहिले. यापुढेही कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.------------पिंपळगावी २५०० रूपये भावपिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती आवारातही कांद्याची ९९८ वाहनांतून चांगली आवक होऊन बाजारभाव किमान १००० ते कमाल २५०० रुपये आणि सरासरी १७५१ रुपये राहिले. गोल्टी कांद्याला ४०० ते १५०० रूपये व सरासरी १२०० रुपये भाव मिळाला. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला किमान १९९० व कमाल २१९० तर सरासरी २०८० रुपये भाव मिळाला.------------------निर्यातीसाठी अर्ज मागवलेबांगलादेश सरकारने कांदा आयातीकरीता निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. पश्‍चिम बंगालप्रमाणेच बांगलादेशमधील कांद्याची आवक संपुष्टात आल्याने आता नवीन कांद्याची आवक सुरू होईपर्यंत भारतीय कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे एक हजार टनाच्या आसपास कांद्याची निर्यात होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉक डाउन असतानाही देशातुन एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याची १४ लाख ०४ हजार मे. टन इतकी निर्यात झाली असून कांदा निर्यातीतून २४३४ कोटी रूपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला कोरोना काळात चांगलेच चलन परकीय मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक